AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanchari Vijay Road Accident | अपघातात गंभीर दुखापत, उपचारादरम्यान राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचे निधन

राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित झालेला कन्नड अभिनेता संचारी विजय (Sanchari Vijay) याचे निधन झाले आहे. अभिनेत्याच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी (11 जून) विजयचा बेंगळुरूमध्ये अपघात झाला होता.

Sanchari Vijay Road Accident | अपघातात गंभीर दुखापत, उपचारादरम्यान राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचे निधन
संचारी विजय
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 2:34 PM

मुंबई : राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित झालेला कन्नड अभिनेता संचारी विजय (Sanchari Vijay) याचे निधन झाले आहे. अभिनेत्याच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी (11 जून) विजयचा बेंगळुरूमध्ये अपघात झाला होता. यात गंभीर जखमी झालेल्या विजयला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान अभिनेता संचारी विजय याचे आज (14 जून) निधन झाले आहे (Famous Kannad actor Sanchari Vijay dies in Road Accident).

अपघातानंतर अभिनेत्यावर एक ऑपरेशन झाले होते, तरीही हा 38 वर्षीय अभिनेता ही लढाई जिंकू शकला नाही. बातमीनुसार विजय हा दुचाकीवरून आपल्या मित्राच्या घरून परत येत असताना हा अपघात घडला होता.

बॉलिवूड अभिनेता किच्चा सुदीप याने ट्विटद्वारे चाहत्यांना ही दु:खद बातमी दिली होती. सुदीप यांनी ट्विट करुन लिहिले आहे की, ‘संचारी विजयने शेवटचा श्वास घेतला, या लॉकडाऊनमध्ये दोनदा त्यांची भेट घेतली होती…तो पुढील चित्रपटाबद्दल खूप उत्सुक होता, जे झाले ते अतिशय खेदजनक आहे. त्याचे कुटुंब आणि मित्रपरिवाराला सावरण्यास शक्ती मिळो…’

पाहा पोस्ट :

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, शुक्रवारी रात्री विजयचा अपघात झाला होता. अपघातामुळे अभिनेत्याच्या मेंदूत उजव्या बाजूला खूप रक्तस्राव झाला होता. ज्यामुळे त्याची प्रकृती खूप गंभीर झाली होती.

राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

2011मध्ये ‘रंगप्पा होगाबिटना’ या चित्रपटाद्वारे विजयने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते आणि त्यानंतर ‘हरिवू’ आणि ‘ओगाराने’ सारख्या हिट चित्रपटांत त्याने काम केले होते. 2015 च्या ‘नानू अवानल्ला अवालु’ या चित्रपटातून संचारी विजयला त्याची खरी ओळख मिळाली. या चित्रपटासाठी अभिनेत्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते. तो अखेर ‘1978’ या चित्रपटात झळकला होता.

कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये विजयने लोकांना खूप मदत केली होती. विजय अशा एका संस्थेशी संबंधित होता, जी कोरोनाने संक्रमित लोकांना ऑक्सिजन प्रदान करत होती. अशाप्रकारे अभिनेत्याच्या अचानक निघून जाण्याने आता सर्वजण दु:खी झाले आहेत.

(Famous Kannad actor Sanchari Vijay dies in Road Accident)

हेही वाचा :

Happy Birthday Jubin Nautiyal | ज्या गाण्याच्या कार्यक्रमात झाला रिजेक्ट, त्याच कार्यक्रमात परीक्षक म्हणून लावली हजेरी, वाचा गायक जुबिन नौटियालचा संघर्ष

Sushant Singh Rajput Death Anniversary | ‘फिर मिलेंगे चलते चलते…’, अंकिता लोखंडेने शेअर केलेला व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यातही येईल पाणी!

पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र.
भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी
भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी.
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....