AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aishwarya Rai : बच्चन आडनावावरून ऐश्वर्याचं स्पष्ट मत; म्हणाली “मी ऐश्वर्या..”

ऐश्वर्याने 2007 मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न केलं. या दोघांचा लग्नसोहळा संपूर्ण देशभरात चर्चेत होता. लग्नानंतर ऐश्वर्याला 'बच्चन कुटुंबाची सून' हा टॅग लागणं साहजिकच होतं. एका मुलाखतीत तिला यावरून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ऐश्वर्याने तिचं स्पष्ट मत मांडलं.

Aishwarya Rai : बच्चन आडनावावरून ऐश्वर्याचं स्पष्ट मत; म्हणाली मी ऐश्वर्या..
Aishwarya RaiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 17, 2023 | 10:19 AM

मुंबई | 17 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री ऐश्वर्या राय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी फॅशनमुळे ऐश्वर्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. नुकतीच तिने पॅरिस फॅशन वीकमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिच्या रॅम्पवॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. ऐश्वर्या ही बच्चन कुटुंबाची सून आहे, हे तर सर्वांनाच माहीत आहे. 2007 मध्ये तिने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. ‘गुरू’ या चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांच्या लग्नाला आता जवळपास 16 वर्षे झाली आहेत. या दोघांना आराध्या ही मुलगी आहे. मात्र फार कमी लोकांना ही गोष्ट माहीत असेल की ऐश्वर्याला फक्त बच्चन कुटुंबाची सून म्हणून हाक मारलेलं किंवा बोललेलं आवडत नाही.

2008 मध्ये एका मुलाखतीत बच्चन कुटुंबाचा टॅग लावण्यावरून ऐश्वर्याने प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी तिला असा प्रश्न विचारण्यात आला होता की, “बच्चन आडनाव लावल्यानंतर तुला स्वत:ची ओळख कुठेतरी दाबून गेल्यासारखं वाटतं का?” त्यावर उत्तर देताना ऐश्वर्या म्हणाली, “खरंतर या प्रश्नाचं माझ्याशी काहीच घेणंदेणं नाही. कारण बच्चन कुटुंबाची सून हा टॅग लोकांनी मला दिला. कारण त्यांना वाचताना ते प्रतिभावान वाटावं. पण माझ्यासाठी हे सर्व थोडं ड्रामॅटिक आहे. मी ऐश्वर्या राय नावाची एक सर्वसामान्य महिला आहे, जी अभिषेक बच्चनसोबत विवाहबंधनात अडकली. आजसुद्धा माझं नाव तेच आहे.”

हे सुद्धा वाचा

ऐश्वर्या आणि अभिषेकची पहिली भेट 2000 मध्ये ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यावेळी दोघांमध्ये फक्त चांगली मैत्री होती. त्यानंतर हळूहळू भेटीगाठी वाढल्या आणि 2006-2007 पर्यंत त्यांनी एकमेकांना डेट केलं. ‘गुरू’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील जवळीक आणखी वाढत गेली आणि त्याचवेळी ऐश्वर्या-अभिषेक एकमेकांच्या प्रेमात पडले.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेकने पत्नी ऐश्वर्याचं तोंडभरून कौतुक केलं. “कधी कधी तुम्ही कामात इतके व्यस्त असता की स्वत:साठीही वेळ नसतो. ऐश्वर्याच्या खांद्यावर घराची संपूर्ण जबाबदारी असते. मी तिच्यावर प्रचंड प्रेम करतो आणि तिचे आभार मानतो. ती सर्व काम नि:स्वार्थपणाने करते,” असं तो म्हणाला.

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.