AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्जुनसोबतच्या ब्रेकअपवर अखेर मलायकाने सोडलं मौन; पहिल्यांदाच सांगितलं कारण?

अभिनेत्री मलायका अरोराने अखेर अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपवर मौन सोडलं आहे. नुकतीच तिने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे तिने अर्जुनसोबतच्या ब्रेकअपमागील कारण सांगितल्याचं म्हटलं जातंय.

अर्जुनसोबतच्या ब्रेकअपवर अखेर मलायकाने सोडलं मौन; पहिल्यांदाच सांगितलं कारण?
Malaika Arora and Arjun KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 22, 2024 | 9:22 AM

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी ब्रेकअप केलं. बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या जोड्यांपैकी ही एक जोडी होती. वयातील अंतर आणि ट्रोलिंगला न जुमानता मलायका आणि अर्जुनने जाहीरपणे एकमेकांविषयीचं प्रेम व्यक्त केलं होतं. आता ब्रेकअपनंतर मलायकाची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या पोस्टद्वारे मलायकाने अप्रत्यक्षपणे अर्जुनसोबतच्या ब्रेकअपमागचं कारण सांगितल्याचं म्हटलं जात आहे. 2018 मध्ये अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर मलायका अर्जुन कपूरला डेट करू लागली होती. सुरुवातीला दोघांनी आपलं नातं लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र अर्जुनच्या एका वाढदिवशी मलायकाने प्रेमाची जाहीर कबुली दिली होती.

मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली आहे. ‘प्रयत्न हे प्रेमासाठी ऑक्सिजनप्रमाणे असतं. त्याशिवाय प्रेमातील आग विझून जाते’, अशा आशयाची ही पोस्ट आहे. या पोस्टचा अर्थ हाच आहे की प्रेमात आपल्या जोडीदारासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याशिवाय ते नातं टिकत नाही. मलायकाने अर्जुनसोबतच्या ब्रेकअपच्या पार्श्वभूमीवर ही पोस्ट लिहिल्याचा अंदाज चाहते वर्तवत आहेत. कदाचित प्रयत्न कमी पडल्यानेच या दोघांचं नातं संपुष्टात आलं असावं, अशी शक्यता नेटकरी व्यक्त करत आहेत.

हे सुद्धा वाचा

गेल्या काही महिन्यांपासून अर्जुन आणि मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपच्या जोरदार चर्चा होत्या. अशातच ‘सिंघम अगेन’च्या प्रमोशनदरम्यान अर्जुनने ‘सिंगल’ असल्याचं जाहीर करत ब्रेकअपवर शिक्कामोर्तब केला होता. त्यानंतर मलायकानेही नोव्हेंबर महिना सुरू होताच ”नो’व्हेंबर.. तुमची ऊर्जा कमी करणाऱ्या लोकांना, ठिकाणांना आणि गोष्टींना नाही म्हणण्याची वेळ आली आहे,’ अशा आशयाची पोस्ट शेअर केली होती. मलायका आणि अर्जुन गेल्या सहा वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते.

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यानही अर्जुनने मलायकाच्या आयुष्यातील अत्यंत कठीण परिस्थितीत तिची साथ दिली. सप्टेंबर महिन्यात मलायकाच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. त्यावेळी मलायकाचं सांत्वन करण्यासाठी अर्जुन पोहोचला होता. मलायकासोबत पुन्हा पाहून नेटकऱ्यांनी दोघांच्या पॅचअपची शक्यता वर्तवली होती. मात्र अर्जुनने आता सिंगल असल्याचा खुलासा केल्याने मलायकासोबतच्या नात्याला पूर्णविराम मिळाला.

हल्ल्यानंतर ओवैसी पहिल्यांदा काश्मीरमध्ये; म्हणाले, 'भारत सरकारने ..'
हल्ल्यानंतर ओवैसी पहिल्यांदा काश्मीरमध्ये; म्हणाले, 'भारत सरकारने ..'.
युद्धाचं सावट, महाराष्ट्रातील ही 3 शहरं अतिसंवेदनशील, विशेष तयारी काय?
युद्धाचं सावट, महाराष्ट्रातील ही 3 शहरं अतिसंवेदनशील, विशेष तयारी काय?.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्याला 'सुप्रीम' आदेश काय
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्याला 'सुप्रीम' आदेश काय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत महत्वाची बैठक.
अमरनाथ : बाबा बर्फानीचं घ्या पहिलं दर्शन, यंदा शिवलिंगांची उंची किती?
अमरनाथ : बाबा बर्फानीचं घ्या पहिलं दर्शन, यंदा शिवलिंगांची उंची किती?.
पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा भारतीय सीमेच्या मार्गावर
पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा भारतीय सीमेच्या मार्गावर.
बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या घरीच केलं जात होतं गांजाचं सेवन
बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या घरीच केलं जात होतं गांजाचं सेवन.
महाराष्ट्रात कुठे-कुठे होणार उद्या मॉकड्रिल? बघा तुमचा जिल्हा आहे का?
महाराष्ट्रात कुठे-कुठे होणार उद्या मॉकड्रिल? बघा तुमचा जिल्हा आहे का?.
भारत- पाकिस्तान दोघांनी शांतता राखावी; यूएनएससीचं आवाहन
भारत- पाकिस्तान दोघांनी शांतता राखावी; यूएनएससीचं आवाहन.
भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष
भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष.