AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aashram 3: ‘आश्रम 3’मध्ये हिंदुत्वाचा अपमान केल्याच्या आरोपांवर बॉबी म्हणाला, “यातून हेच सिद्ध होतं की..”

या सीरिजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनप्रमाणेच तिसऱ्या सिझनलाही बराच विरोध झाला. भोपाळमधील या सीरिजच्या सेटवर तोडफोडदेखील करण्यात आली होती. या सीरिजमध्ये दाखवलेल्या कथानकामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे.

Aashram 3: 'आश्रम 3'मध्ये हिंदुत्वाचा अपमान केल्याच्या आरोपांवर बॉबी म्हणाला, यातून हेच सिद्ध होतं की..
Bobby DeolImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 12:30 PM

एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 3 जून रोजी ‘आश्रम 3: एक बदनाम आश्रम’ (Aashram 3) ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली. बॉबी देओल, इशा गुप्ता, चंदन रॉय सन्याल, अनुप्रिया गोयंका, त्रिधा चौधरी, तुषार पांडे यांसारख्या कलाकारांच्या यात भूमिका आहेत. या सीरिजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनप्रमाणेच तिसऱ्या सिझनलाही बराच विरोध झाला. भोपाळमधील या सीरिजच्या सेटवर तोडफोडदेखील करण्यात आली होती. या सीरिजमध्ये दाखवलेल्या कथानकामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपांवर दिग्दर्शक प्रकाश झा (Prakash Jha) याआधी दिलेल्या मुलाखतींमध्ये व्यक्त झाले होते. आता अभिनेता बॉबी देओलने (Bobby Deol) त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. बॉबी या सीरिजमध्ये ढोंगी बाबा निरालाची भूमिका साकारत आहे.

‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत बॉबी म्हणाला, “मी इतकंच म्हणू शकतो की जर हा शो इतका चालला असेल तर नक्कीच लोकांनी तो पाहिला असेल. फक्त दोन ते तीन टक्के लोक असे असतील ज्यांना ही सीरिज आवडली नसेल. प्रत्येकाची आपापली वेगळी मतं असतात. आपण एखाद्या व्यक्तीला त्याची मतं मांडण्यापासून रोखू शकत नाही. तुम्ही जर या सीरिजचा यश पाहिला तर त्यातून हेच सिद्ध होतं की सीरिजमध्ये काहीच चुकीचं नाही.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

याआधी ‘झूम डिजिटल’ला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश झा म्हणाले होते, “भारतात धर्माविषयी खूप चांगली ओळ म्हटली जाते. माणूस धर्माला नाही वाचवू शकत, धर्म माणसाला वाचवतो. त्यामुळे ज्यांना असं वाटतं की आपण धर्माला वाचवत आहोत, तो त्यांचा गोड गैरसमज आहे.” आश्रम या सीरिजच्या तीन यशस्वी सिझननंतर आता चौथा सिझनसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चौथ्या सिझनचा टीझरसुद्धा प्रदर्शित झाला आहे.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.