AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकीय मेळाव्यांना खच्चून गर्दी होते, रेस्टॉरंट, पब्ज सुरू आहेत, मग चित्रपटगृह का सुरू होत नाही?; मनसेचा सवाल

राजकीय मेळाव्यांना खच्चून गर्दी आहे…रेस्टॉरंट्स, पब्जमध्ये तुडुंब पार्ट्या सुरु आहेत… मॉल्समध्ये खरेदीसाठी झुंबड उडालेली असते… पण तरीही नाट्यगृहं-चित्रपटगृहं अजूनही पन्नास टक्के क्षमतेनेच चालवायची असा महाआघाडी सरकारचा अजब न्याय आहे.

राजकीय मेळाव्यांना खच्चून गर्दी होते, रेस्टॉरंट, पब्ज सुरू आहेत, मग चित्रपटगृह का सुरू होत नाही?; मनसेचा सवाल
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 2:50 PM

मुंबई – कोरोनाच्या (corona) कारणामुळे अनेकांना व्यवसायात आणि नोकरीत तोटा सहन करावा लागला होता. दोन वर्षात अनेकांना कोरोनाचा सामना करावा लागला. तसेच अनेकजण आपल्या जवळचे सोडून गेले आहेत. कोरोनाची नियमावली लागू केलेली अजून काही प्रमाणात असल्याचे आपणास पाहावयास मिळत आहे. कारण आता सगळीकडे गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. परंतु नाट्यगृह-चित्रपटगृह अजूनही पन्नास टक्के क्षमतेने सुरू असल्याने मनसेच्या (mns) चित्रपटसेनेने राज्य सरकारला आग्रहाची मागणी केली आहे. कारण आत्तपर्यंत राजकीय मेळाव्यांना खच्चून गर्दी, रेस्टॉरंट्स, पब्जमध्ये तुडुंब पार्ट्या सुरु आहेत आणि मॉल्समध्ये खरेदीसाठी झुंबड उडालेली असते. पण लोकांच्या मंनोरंजानाचं साधन अजून का बंद ठेवलं आहे. त्यामुळे अनेक कित्येक लोकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतोय असं प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर (amey khopkar) यांनी केला आहे.

प्राजक्ता माळी काय म्हणाल्या

‘पावनखिंड’ सारख्या भव्य ऐतिहासिक चित्रपटापासून १०० टक्के आसनक्षमतेने चित्रपटगृहं सुरु करावीत, ही मनसे चित्रपटसेनेची आग्रही मागणी आहे. त्याचबरोबर अभिनेत्री प्राजक्ता माळी हीने सुध्दा ‘पावनखिंड’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे, तसेच तो अनेकांना आवडताना दिसत आहे. तो चित्रपट सगळ्यांना आवडेल अशी आम्हाला खात्री आहे. फक्त सरकारला आमची एकचं विनंती आहे, की सगळीकडे कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे चित्रपट आणि थिअटर पुर्ण क्षमतेने सुरू करावी. राज्यातले अनेक ठिकाणचे सगळे नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे नाट्यगृह-चित्रपटगृह सुरू करावीत. शिवजयंती सुध्दा आता जवळ आली त्यामुळे आम्हा सगळ्या कलाकारांची अशी विनंती आहे की, थिअटर सुरू व्हावेत. आम्हाला आशा आहे की राज्य सरकार याबाबत आता सकारात्मक पाऊल उचलेलं

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेची मागणी

राजकीय मेळाव्यांना खच्चून गर्दी आहे…रेस्टॉरंट्स, पब्जमध्ये तुडुंब पार्ट्या सुरु आहेत… मॉल्समध्ये खरेदीसाठी झुंबड उडालेली असते… पण तरीही नाट्यगृहं-चित्रपटगृहं अजूनही पन्नास टक्के क्षमतेनेच चालवायची असा महाआघाडी सरकारचा अजब न्याय आहे. हा अन्याय आतातरी सरकारने दूर करावा. ‘पावनखिंड’ सारख्या भव्य ऐतिहासिक चित्रपटापासून १०० टक्के आसनक्षमतेने चित्रपटगृहं सुरु करावीत, ही मनसे चित्रपटसेनेची आग्रही मागणी आहे.

किरण मानेंच्या विरोधात मनसे मैदानात, ‘इतर कलाकारांना त्यांनी त्रास दिला, योग्य वेळेस उत्तर देऊ!’

Ameya Khopkar | जास्मिन वानखेडे आमच्या पक्षात काम करतात याचा आम्हाला अभिमान : अमेय खोपकर

Video: राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागरांना ‘पुष्पा’ने लावले वेड; म्हणतात…!

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.