दोघं भांडत राहिले, तिला मात्र…, सलमान – विवेक यांच्या भांडणावर सलीम खान यांनी सोडलं मौन

Salman Khan | ऐश्वर्या राय हिचं नाव न घेता सलीम खान यांनी केला मोठा खुलासा, सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्या भांडणांबद्दल सलीम खान म्हणाले..., सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याच्या चर्चा कायम रंगत असतात...

दोघं भांडत राहिले, तिला मात्र..., सलमान - विवेक यांच्या भांडणावर सलीम खान यांनी सोडलं मौन
Follow us
| Updated on: May 20, 2024 | 11:53 AM

अभिनेता सलमान खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, घराबाहेर झालेल्या गोळीबारामुळे चर्चेत आहे. गोळीबारानंतर अभिनेत्याच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली आहे. शिवाय सहा जणांना पोलिसांनी अटक देखील केली आहे. याआधी देखील अभिनेत्याला अनेकदा जीवेमारण्याची धमकी देण्यात आली होती. यावर सलमान खान याचे वडील आणि लेखक सलीम खान यांनी मौन सोडलं होतं. आता देखील सलीम खान यांनी भाईजनचं लग्न, विवेक ओबेरॉय सोबत झालेले वाद… यांवर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र सलीम खान यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यामध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यामुळे वाद टोकाला गेले. सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात विवेक याची एन्ट्री झाली. त्यानंतर विवेक आणि सलमान यांच्यात अनेक वाद झाले. यावर सलीन खान यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

सलीम खान म्हणाले, ‘काही विषय भावनात्मक असतात. त्यावर कोणतंही समाधान नसतं. सलमान आणि विवेक दोघे तेव्हा भावनात्मक होते. दोघांना नंतर जाणीव होईल की, कोणताच अर्थ नसलेल्या गोष्टीवर त्यांचे वाद झाले आहेत. दोघांमध्ये जिच्यामुळे वाद झाले, तिला तर तिसराच घेऊन गेला आणि दोघे तिथेच राहिले…’ ऐश्वर्या राय हिचं नाव न घेता सलीम खान यांनी मोठा खुलासा केला.

एवढंच नाही तर, सलीम खान यांनी सलमान खान याच्या लग्नावर देखील स्पष्टीकरण दिलं. 2009 च्या पूर्वी सलमान खान याचा कोणताच सिनेमा बॉक्स ऑफिस हीट ठरत नव्हता. तेव्ही सलीम खान अभिनेत्याला म्हणाले होते, 2009 नंतर तुझ्या आयुष्यात खूप बदल होतील. 2009 नंतर भाईजानचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर हीट ठरले. अभिनेत्याच्या लग्नाबद्दल देखील सलीम खान म्हणाले होते.

पुढच्या एक दोन वर्षा सलमान याचं लग् झालं तर होईल. असं नाही झालं तर, त्याच्या लग्नाच्या शक्यता फार कमी आहे. सलम खान यांनी भाईजानबद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरली. 2009 नंतर सलमान खान याच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. पण अभिनेत्याच्या खासगी आयुष्यात मात्र कोणाची एन्ट्री झाली नाही. वयाच्या 58 व्या वर्षी देखील अभिनेता एकटाच आयुष्य जगत आहे.

अभिनेता सलमान खान याने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत भाईजानचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्यापासून अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यापर्यंत अभिनेत्याने अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे.

सलमान खान याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता ‘सिंकदर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेता कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.