AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोघं भांडत राहिले, तिला मात्र…, सलमान – विवेक यांच्या भांडणावर सलीम खान यांनी सोडलं मौन

Salman Khan | ऐश्वर्या राय हिचं नाव न घेता सलीम खान यांनी केला मोठा खुलासा, सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्या भांडणांबद्दल सलीम खान म्हणाले..., सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याच्या चर्चा कायम रंगत असतात...

दोघं भांडत राहिले, तिला मात्र..., सलमान - विवेक यांच्या भांडणावर सलीम खान यांनी सोडलं मौन
Follow us
| Updated on: May 20, 2024 | 11:53 AM

अभिनेता सलमान खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, घराबाहेर झालेल्या गोळीबारामुळे चर्चेत आहे. गोळीबारानंतर अभिनेत्याच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली आहे. शिवाय सहा जणांना पोलिसांनी अटक देखील केली आहे. याआधी देखील अभिनेत्याला अनेकदा जीवेमारण्याची धमकी देण्यात आली होती. यावर सलमान खान याचे वडील आणि लेखक सलीम खान यांनी मौन सोडलं होतं. आता देखील सलीम खान यांनी भाईजनचं लग्न, विवेक ओबेरॉय सोबत झालेले वाद… यांवर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र सलीम खान यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यामध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यामुळे वाद टोकाला गेले. सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात विवेक याची एन्ट्री झाली. त्यानंतर विवेक आणि सलमान यांच्यात अनेक वाद झाले. यावर सलीन खान यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

सलीम खान म्हणाले, ‘काही विषय भावनात्मक असतात. त्यावर कोणतंही समाधान नसतं. सलमान आणि विवेक दोघे तेव्हा भावनात्मक होते. दोघांना नंतर जाणीव होईल की, कोणताच अर्थ नसलेल्या गोष्टीवर त्यांचे वाद झाले आहेत. दोघांमध्ये जिच्यामुळे वाद झाले, तिला तर तिसराच घेऊन गेला आणि दोघे तिथेच राहिले…’ ऐश्वर्या राय हिचं नाव न घेता सलीम खान यांनी मोठा खुलासा केला.

एवढंच नाही तर, सलीम खान यांनी सलमान खान याच्या लग्नावर देखील स्पष्टीकरण दिलं. 2009 च्या पूर्वी सलमान खान याचा कोणताच सिनेमा बॉक्स ऑफिस हीट ठरत नव्हता. तेव्ही सलीम खान अभिनेत्याला म्हणाले होते, 2009 नंतर तुझ्या आयुष्यात खूप बदल होतील. 2009 नंतर भाईजानचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर हीट ठरले. अभिनेत्याच्या लग्नाबद्दल देखील सलीम खान म्हणाले होते.

पुढच्या एक दोन वर्षा सलमान याचं लग् झालं तर होईल. असं नाही झालं तर, त्याच्या लग्नाच्या शक्यता फार कमी आहे. सलम खान यांनी भाईजानबद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरली. 2009 नंतर सलमान खान याच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. पण अभिनेत्याच्या खासगी आयुष्यात मात्र कोणाची एन्ट्री झाली नाही. वयाच्या 58 व्या वर्षी देखील अभिनेता एकटाच आयुष्य जगत आहे.

अभिनेता सलमान खान याने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत भाईजानचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्यापासून अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यापर्यंत अभिनेत्याने अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे.

सलमान खान याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता ‘सिंकदर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेता कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.