AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Taarak Mehta | ‘तारक मेहता’ने अखेर सांगितलं मालिका सोडण्यामागचं खरं कारण; निर्मात्यांविषयी केला मोठा खुलासा

निर्मात्यांनी त्यांची फी परत केली नसल्याचेही आरोप झाले. त्यावर निर्माते असित कुमार मोदी यांचीही प्रतिक्रिया समोर आली. इतकंच नव्हे तर हे दोघं अप्रत्यक्षपणे एकमेकांवर निशाणा साधताना दिसले.

Taarak Mehta | 'तारक मेहता'ने अखेर सांगितलं मालिका सोडण्यामागचं खरं कारण; निर्मात्यांविषयी केला मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 1:50 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मालिकेशी संबंधित काही नकारात्मक चर्चा समोर येत आहेत. या मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी मालिकेला रामराम केला. त्यानंतर या चर्चांना उधाण आलं. निर्मात्यांनी त्यांची फी परत केली नसल्याचेही आरोप झाले. त्यावर निर्माते असित कुमार मोदी यांचीही प्रतिक्रिया समोर आली. इतकंच नव्हे तर हे दोघं अप्रत्यक्षपणे एकमेकांवर निशाणा साधताना दिसले. आता याप्रकरणी शैलेश लोढा यांनी अखेर मालिका सोडण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

निर्मात्यांवर अप्रत्यक्ष निशाणा

शैलेश लोढा यांनी नुकताच एका साहित्यिक कार्यक्रमात भाग घेतला होता. या कार्यक्रमात त्यांनी सुंदर कविता वाचून दाखवल्या. त्यानंतर त्यांना जेव्हा मालिकेविषयी विचारण्यात आलं, तेव्हा ते म्हणाले, “जे मागे निघून गेलं, त्याच्याविषयी काय विचार करायचा? तुम्ही माझ्या इशाऱ्यांमधून माझं बोलणं समजून घ्या. पुस्तकं छापणारे पब्लिशर हिऱ्याची अंगठी घालून फिरत आहेत आणि लेखकाला आपलंच पुस्तक छापण्यासाठी पैसे द्यावे लागत आहेत. जेव्हा दुसऱ्यांच्या प्रतिभेतून कमावणारे व्यापारी स्वत:ला त्यांच्यापेक्षा मोठं समजू लागतात, तेव्हा त्यांना हे सांगणं खूप गरजेचं असतं की ते इतरांच्या प्रतिभेतून कमाई करत आहेत.”

“..तेव्हा माझा ज्वालामुखी फुटेल”

हे सर्व बोलताना निर्मात्यांवर निशाणा साधत ते पुढे म्हणाले, “मी ती व्यक्ती आहे, जिने आवाज उठवला. या जगातील कोणताच पब्लिशर एका लेखकापेक्षा कधीच मोठा होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे जगातील कोणताच निर्माता एखाद्या अभिनेत्यापेक्षा मोठा होऊ शकत नाही. मी कवी आणि अभिनेता आहे. जेव्हा जेव्हा मी कवी किंवा अभिनेता असण्यावर किंवा माझ्या विचारांवर दबाव आणला जाईल, तेव्हा तेव्हा माझा ज्वालामुखी फुटेल.”

हे सुद्धा वाचा

शैलेश लोढा यांची फी थकवली?

शैलेश लोढा यांची सहा आकडी फी निर्मात्यांनी थकवल्याची चर्चा होती. गेल्या वर्षी त्यांनी ही मालिका सोडली. मालिकेत आता त्यांची जागा अभिनेता साहिल श्रॉफने घेतली आहे. शैलेश यांनी मानधन थकवल्याच्या चर्चांवर थेट प्रतिक्रिया दिली नाही. मात्र एका मुलाखतीत ते उपरोधिकपणे म्हणाले होते, “यात काही नवीन नाही.”

“मालिका सोडल्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यास अनेकदा सांगूनही शैलेश लोढा यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. जेव्हा तुम्ही कोणताही शो किंवा कंपनी सोडता, तेव्हा तुम्हाला ती प्रक्रिया पूर्ण करावी लागते. कोणतीच कंपनी प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय मानधन देत नाही”, असं मालिकेचे प्रोजेक्ट हेड सुहेल रमाणी म्हणाले.

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.