AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भल्याभल्यांची बोलती बोलती बंद करणारी, ‘ती परत आलीये’ची ‘ती’ नेमकी दिसते तरी कशी? पाहा ‘ती’चा फोटो…

झी मराठी वाहिनीवरील 'ती परत आलीये' (Ti Parat Aaliye) या आगामी मालिकेची जोरदार चर्चा सर्वत्र सुरु आहे. संपूर्ण महाराष्ट्राला एकच प्रश्न पडला आहे की, ती म्हणजे नक्की कोण आहे? तिची झलक नुकतीच झी मराठीवर मालिकेच्या नवीन प्रोमो मधून प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

भल्याभल्यांची बोलती बोलती बंद करणारी, ‘ती परत आलीये’ची ‘ती’ नेमकी दिसते तरी कशी? पाहा ‘ती’चा फोटो...
ती परत आलीये
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 12:11 PM

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील ‘ती परत आलीये’ (Ti Parat Aaliye) या आगामी मालिकेची जोरदार चर्चा सर्वत्र सुरु आहे. संपूर्ण महाराष्ट्राला एकच प्रश्न पडला आहे की, ती म्हणजे नक्की कोण आहे? तिची झलक नुकतीच झी मराठीवर मालिकेच्या नवीन प्रोमो मधून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. एक चित्तथरारक चेहरा आणि त्यामागे अंगावर भीतीने काटा आणणारं बॅकग्राउंड म्युजिक असलेला हा प्रोमो पाहून अनेकांची झोप उडाली आहे.

झी मराठीवर अगदी रात्रीच्यावेळी हा प्रोमो प्रसारित झाला आणि या प्रोमो नंतर एकच खळबळ उडाली की, ती नक्की कोण आहे? हा भयानक चेहरा आहे की मुखवटा? ‘ती परत आलीये’ असं विजय कदम आधीच्या प्रोमोमध्ये म्हणतात, पान आता तिची झलक संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे.

पाहा ‘ती’चा फोटो!

Ti Parat Aaliye

Ti Parat Aaliye

 ‘ती’चा प्रवास खूप दूरवरचा!

ती कोण आहे, याबद्दल बोलताना विजय कदम म्हणाले, “तिचा हा भयावह चेहरा मालिकेत देखील प्रेक्षकांच्या भेटीस येईल. ती कोण आहे, हे मला माहिती नाही.. पण तिच्या येण्याचा प्रवास खूप दूरवरचा आहे. त्यामुळे सध्या तिच्या भोवती गूढ वलय रंगवण्यात आम्ही सगळे कलाकार रमलो आहोत. त्यामुळे ती कोण आहे, हे प्रेक्षकांना मालिकेसोबत उलगडत जाईल.” अभिनेता विजय कदम यांच्या व्यतिरिक्त या मालिकेतील कलाकारांची फौज कोण आहे, याची माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवली आहे.

विजय कदम यांचे पुनरागमन!

नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. जेष्ठ अभिनेते विजय कदम या मालिकेत एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेते विजय कदम हे बऱ्याच कालावधी नंतर टीव्हीवर पुनरागमन करणार आहेत. प्रोमोमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं कि, विजय कदम एका परिसरात गस्त घालत आहेत आणि त्या परिसरामध्ये काही हत्या घडत आहेत. त्यामुळे सावध राहा अशी चेतावणी देताना, ते दिसत आहेत. नक्की ही भानगड काय आहे?  या मालिकेत अजून कोण कलाकार असणार आहेत?  ही सर्व माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

पाहा नवा प्रोमो :

‘देवमाणूस’ प्रेक्षकांचा निरोप घेणार

झी मराठीवरील ‘देवमाणूस’ (Devmanus) या मालिकेने आपल्या वेगळ्या कथानकामुळे लोकप्रियतेचं शिखर गाठलं. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आणि प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि त्याजागी ‘ती परत आलीये’ (Tee Parat Aaliye)  ही एक नवीन गूढ रहस्यमय मालिका 16 ऑगस्ट पासून रात्री 10.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हेही वाचा :

बच्चे कंपनीचा थरकाप उडवणारं नाटक अलबत्या गलबत्याचा सेट चोरीला!

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेचा 300 एपिसोड्सचा टप्पा पूर्ण, प्रोमो शेअर करत मानले प्रेक्षकांचे आभार

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.