AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलाचा रंग गोरा तर मुलगी सावळी..; वर्णभेदावर ट्विंकल खन्नाचं सडेतोड उत्तर

अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार यांना आरव हा मुलगा आणि नितारा ही मुलगी आहे. मात्र या दोन्ही मुलांच्या रंगावरून अनेकदा तुलना झाल्याचं ट्विंकलने सांगितलं. मुलगा गोरा आणि मुलगी सावळी कशी, अशा टिप्पण्यांना त्यांना सामोरं जावं लागतं, असं ट्विंकल म्हणाली.

मुलाचा रंग गोरा तर मुलगी सावळी..; वर्णभेदावर ट्विंकल खन्नाचं सडेतोड उत्तर
ट्विंकल खन्ना, अक्षय कुमार आणि त्यांची मुलंImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 27, 2024 | 9:48 AM

1990 च्या दशकात ट्विंकल खन्ना ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. लग्नानंतर तिने चित्रपटांमध्ये फारसं काम केलं नाही. ती लिखाणाकडे वळली. ट्विंकल आणि अक्षय कुमार यांना आरव हा मुलगा आणि नितारा ही मुलगी आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ट्विंकलने सांगितलं की तिच्या दोन्ही मुलांच्या स्कीन टोनवरून (वर्ण/रंग) अनेकदा भेदभाव होतो. मात्र आपण जसं आहोत तसं स्वत:ला स्विकारावं हे त्यांना शिकवण्याचा निश्चय तिने केला आहे. या मुलाखतीत ट्विंकलने तिच्या मुलीचा एक किस्सासुद्धा सांगितला आहे.

“माझ्या पहिल्या बाळासोबत मीसुद्धा बऱ्याच गोष्टी शिकले आणि माझ्या मते तुमचं बाळ हे जणू तुमच्यासाठी एकाप्रकारचं मॅन्युअलच असतं. तुम्हीसुद्धा बाळासोबत नवनवे प्रयोग करू पाहता. पण जेव्हा मला दुसरं बाळं झालं, तेव्हा मला अनेकदा त्या दोघांमध्ये तुलना झाल्याचं पहायला मिळालं. माझी मुलगी नितारा ही सर्वसामान्य भारतीय मुलीसारखी दिसते. पण तिच्या भावाचा वर्ण आणि दिसणं यावरून नेहमी तिची तुलना केली जाते. हा वर्णभेद आपल्या देशात खूप आधीपासूनच आहे. त्यामुळे मी ठरवलं की मी माझ्या मुलीने अशा पद्धतीने शिकवेन, जेणेकरून तिच्यातील आत्मविश्वास वाढेल आणि तिला स्वत:विषयी नेहमीच खूप चांगलं वाटेल. उदाहरण द्यायचं झाल्यास, तिच्या भुवया जोडलेल्या आहेत. त्यावरून मी तिला म्हणाले की तू फ्रिडा काहलोसारखी सुंदर दिसते. तिच्यासारखीच तू सुद्धा विस्मयकारक आहेत. तिचा वर्ण सावळा आहे, तर ती तिला सांगते की तिची त्वचा सोनेरी रंगाची आहे”, असं ट्विंकल म्हणाली.

हे सुद्धा वाचा

या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय झाला, याविषयी सांगताना ती पुढे म्हणाली, “एकेदिवशी नितारा तिच्या भावासोबत समुद्रकिनारी जात होती. त्यावेळी तिने सनस्क्रीन किंवा सनब्लॉक लावण्यास नकार दिला. मला त्याची गरज नाही, कारण माझी त्वचा तुझ्यापेक्षा चांगली आहे, असं ती म्हणाली. त्यानंतर तिने एका ब्राऊन टी-शर्टची तुलना स्वत:शी आणि पांढऱ्या टी-शर्टची तुलना भावाशी केली. पांढरा टी-शर्ट लवकर खराब होतो, पण ब्राऊन लवकर मळत नाही, असं ती म्हणाली. हे ऐकून मला एकप्रकारे माझा विजय झाल्यासारखं वाटलं होतं.”

ट्विंकलने 2002 मध्ये आरवला जन्म दिला. त्यानंतर 2012 निताराचा जन्म दिला. आरव आणि नितारा यांच्या वयात दहा वर्षांचं अंतर आहे. आरवच्या दिसण्याचं अनेकदा नेटकऱ्यांकडून कौतुक होतं. तर निताराचा चेहरा ट्विंकल आणि अक्षयने बरीच वर्षे सोशल मीडियावर दाखवलं नव्हतं. अनेकदा ते तिचे पाठमोरे किंवा ज्यात तिचा चेहरा दिसणार नाही असेच फोटोच पोस्ट करायचे.

वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर
वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर.
भारतानं पाकचं पाणी रोखल, खळखळून वाहणाऱ्या 'चिनाब'ची अवस्था नाल्यासारखी
भारतानं पाकचं पाणी रोखल, खळखळून वाहणाऱ्या 'चिनाब'ची अवस्था नाल्यासारखी.
2 आणि 5 वर्षांची मुलं पाकिस्तानात, आई भारतात; अटारी सीमेवर ताटातुट
2 आणि 5 वर्षांची मुलं पाकिस्तानात, आई भारतात; अटारी सीमेवर ताटातुट.
काँग्रेस फोडा, खाली करा... ते आपल्याकडे.. भाजपच्या बड्या नेत्याचा आदेश
काँग्रेस फोडा, खाली करा... ते आपल्याकडे.. भाजपच्या बड्या नेत्याचा आदेश.
युद्धाची चाहूल? पीओकेमध्ये पळापळ, रेशनची साठवणूक, मदरशे बंद
युद्धाची चाहूल? पीओकेमध्ये पळापळ, रेशनची साठवणूक, मदरशे बंद.
भारतीय सुरक्षा संस्थांकडून अ‍ॅक्टिव्ह दहशतवादी समोर, मुख्य लीडर कोण?
भारतीय सुरक्षा संस्थांकडून अ‍ॅक्टिव्ह दहशतवादी समोर, मुख्य लीडर कोण?.
आज बारावीचा निकाल; निकालापूर्वी वडिलांच्या आठवणीने वैभवी भावुक
आज बारावीचा निकाल; निकालापूर्वी वडिलांच्या आठवणीने वैभवी भावुक.
यंदाही कोकणचे विद्यार्थी अव्वल; सर्वाधिक 96.74 टक्के निकाल
यंदाही कोकणचे विद्यार्थी अव्वल; सर्वाधिक 96.74 टक्के निकाल.
बारावीचा रिझल्ट लागला, राज्याचा निकाल किती टक्के? यंदा बाजी कोणाची?
बारावीचा रिझल्ट लागला, राज्याचा निकाल किती टक्के? यंदा बाजी कोणाची?.
भारताची पाऊलं अफगाणिस्ताननं ओळखली? माजी राष्ट्रपती म्हणाले, असं वाटतंय
भारताची पाऊलं अफगाणिस्ताननं ओळखली? माजी राष्ट्रपती म्हणाले, असं वाटतंय.