AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंकिता-सुशांतच्या नात्यावरून पती विकीचा सुटला ताबा; म्हणाला “तू 10 दिवससुद्धा..”

अंकिता आणि सुशांत सिंह राजपूत यांचं नातं जगजाहीर होतं. आता याच नात्यावरून पती विकी जैनने अंकिताला सुनावलं आहे. वीकेंड का वार एपिसोडमध्ये करण जोहरने विकीची चांगलीच शाळा घेतली. त्यानंतर तो विविध मुद्द्यांवरून अंकितावर भडकला.

अंकिता-सुशांतच्या नात्यावरून पती विकीचा सुटला ताबा; म्हणाला तू 10 दिवससुद्धा..
अंकिता, विकी, सुशांतImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 15, 2024 | 9:26 AM

मुंबई : 15 जानेवारी 2024 | ‘बिग बॉस 17’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यातील वाद काही थांबेनात. वीकेंड का वार एपिसोडमध्ये निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने विकीची चांगलीच शाळा घेतली. नॅशनल टेलिव्हिजनवर तुझी आई अंकिताला बरंवाईट बोलत असताना तू तिची बाजू का घेतली नाही, असा सवाल करणने विकीला केला. त्यानंतर विकीने अंकिताला विचारलं की त्याची आई तिला नेमकं काय म्हणाली? जेव्हा अंकिताच्या तोंडून विकी संपूर्ण घटना ऐकतो, तेव्हा तो पुन्हा तिच्यावरच चिडतो.

“तुझ्या वडिलांना हे आवडलं असतं का?”

विकी अंकिताला म्हणतो, “तुझे वडील काय म्हणाले असते? त्यांना हे सर्व आवडलं असतं का? मला असं वाटतंय की माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांना चुकीच्या पद्धतीने दाखवत आहेत. तुझं कुटुंब हे सर्व सहन करतंय, अशी प्रतिमा निर्माण केली जातेय. माझ्या कुटुंबीयांनी कधीही तुझ्या करिअरमध्ये, आपल्या आयुष्यात किंवा तू कोणते कपडे परिधान करतेस आणि कशी राहतेस या सर्वांत अडथळा आणला का?” विकीच्या या प्रश्नांना अंकिता नकारार्थी उत्तर देते.

“आपल्या दोघांच्या आईने आपल्याला अशा पद्धतीने भांडताना किंवा वागताना कधीच पाहिलं नाही. त्यामुळे त्यांना वाईट वाटतंय. मला तुझ्या घरात खूप प्रेम आणि आदर मिळाला. पण या भांडणांमुळे मला ते गमवायचं नाही. म्हणूनच मी तुझ्या कुटुंबीयांची माफी मागतेय. मी हजार वेळा माफी मागायला तयार आहे”, असं अंकिता विकील म्हणते. टीव्हीवर गोष्टी कशा पद्धतीने दाखवल्या जात आहेत आणि अंकिता बिग बॉसच्या घरात कशी वागतेय, यावरून विकी पुन्हा तिला सुनावत असतो.

हे सुद्धा वाचा

विकीने अंकिताला सुनावलं

“मी तुला किती वेळा सांगितलंय की गोष्टी कशा पद्धतीने दाखवल्या जात आहेत. एखाद्या घटनेवर कशा पद्धतीने प्रतिक्रिया द्यावी आणि त्याचे परिणाम काय होतील हे तुला समजलं पाहिजे. गेल्या चार-पाच वर्षांत माझ्या कुटुंबीयांनी कधीच आपल्या लग्नाबद्दल काहीच म्हटलं नव्हतं. त्यांनी आपल्यावर कोणतीच बंधनं लादली नाहीत. तू बिलासपूरला नाही गेलीस तरी माझ्या कुटुंबीयांनी कधीच तुझ्यावर बळजबरी केली नाही. माझ्या कुटुंबीयांनी कधी तुझ्याकडून कोणती अपेक्षा केली का?”, असा सवाल तो अंकिताला करतो.

यापुढे बोलताना विकी अंकिताच्या भूतकाळातील रिलेशनशिपचा उल्लेख करतो. “जेव्हा मी तुझ्या घरी राहायला आलो तेव्हा एखाद्या श्रीमंत जावयासारखा किंवा मुलासारखा राहिलो का? तुझ्या आणि तुझ्या कुटुंबीयांच्या लाइफस्टाइलनुसार मी स्वत:ला बदलून घेतलं. जेव्हा मी तुझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये होतो, तेव्हा सुशांतसोबतचं (सुशांत सिंह राजपूत) तुझं नातं नॅशनल टेलिव्हिजनवर जगजाहीर होतं. त्या सर्वांची झळ मला सहन करावी लागली. ते सर्व मी स्वत:वर ओढवून घेतलं. तुला जर माझ्याकडून काही समस्या असती तर तू लग्नच केलं नसतं. तू स्वत:ला लग्नाचा निर्णय घेतलास. मी तुझ्या संपूर्ण कुटुंबीयांसोबत नेहमीच उभा होतो”, अशा शब्दांत विकी व्यक्त होतो.

विकीचं ऐकल्यानंतर अंकिता त्याला म्हणते की माझ्यासाठी लग्न आणि कुटुंबाशिवाय अधिक काहीच महत्त्वाचं नाही. अंकिता पुन्हा पुन्हा विकीची माफी मागते. मात्र विकी ऐकण्यास तयार नसतो. तो पुढे सुनावतो, “माफीने काहीच बदलणार नाही. इथे प्रतिमा मलिन होतेय. एक मुलगा म्हणून मी तुझ्या आणि कुटुंबीयांच्या पाठिशी होतो.” त्यावर अंकिता म्हणते की, “मीसुद्धा या नात्याला 100 टक्के दिले आहेत.” अंकिताला थांबवत विकी म्हणतो, “तू बिलासपूरमध्ये माझ्या घरी दहा दिवससुद्धा गेली नव्हतीस. तू मुंबईतच राहिलीस आणि तुझं आयुष्य जगलीस.”

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.