AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमीषासोबतच्या रिलेशनशिपबद्दल अखेर विक्रम भट्ट यांनी सोडलं मौन; म्हणाले “जेव्हा वाईट काळ आला..”

अमीषा पटेल आणि दिग्दर्शक विक्रम भट्ट हे जवळपास दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या नात्याविषयी विक्रम भट्ट मोकळेपणे व्यक्त झाले. 'गदर 2' प्रदर्शित होण्यापूर्वी अमीषानेही विक्रम भट्टसोबतच्या नात्याविषयी खुलासा केला होता.

अमीषासोबतच्या रिलेशनशिपबद्दल अखेर विक्रम भट्ट यांनी सोडलं मौन; म्हणाले जेव्हा वाईट काळ आला..
Ameesha Patel and Vikram BhattImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 05, 2023 | 1:51 PM

मुंबई | 5 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री अमीषा पटेल सध्या तिच्या ‘गदर 2’ या चित्रपटाच्या तुफान यशामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानिमित्त दिलेल्या विविध मुलाखतींमध्ये अमीषा तिच्या खासगी आयुष्याविषयी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. एका मुलाखतीत तिने निर्माता-दिग्दर्शक विक्रम भट्टसोबतच्या रिलेशनशिपविषयीचा खुलासा केला होता. आता विक्रम भट्ट हे अमीषासोबतच्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले आहेत. अमीषाने विक्रम भट्टसोबतचं नातं जाहीर केलं होतं. मात्र त्याचा परिणाम तिच्या करिअरवर झाला. अमीषा आणि विक्रम हे जवळपास दोन वर्ष एकमेकांना डेट करत होते.

अमीषासोबतच्या नात्याबद्दल काय म्हणाले?

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विक्रम भट्ट म्हणाले, “अमीषा आणि मी एकत्र वाईट काळ पाहिला. मात्र जेव्हा आमचा चांगला काळ सुरू झाला, तेव्हा दुर्दैवाने आम्ही सोबत नव्हतो. माझे एकानंतर एक चित्रपट फ्लॉप होत होते. तीसुद्धा खूप संघर्ष करत होती. अखेर 1920 या माझ्या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी आमचा ब्रेकअप झाला होता. त्यानंतर माझे शापित आणि हाँटेडसारखे चित्रपट प्रदर्शित झाले.”

“मी अमीषाचा संघर्ष पाहिला आहे. तिने कहो ना प्यार है, गदर, हमराजसारखे हिट चित्रपट दिले. मात्र काही काळानंतर इतर अभिनेत्री तिच्या पुढे निघून गेल्या. मीसुद्धा बऱ्याच दिग्दर्शकांना माझ्या मागून येऊन पुढे जाताना पाहिलं. त्यामुळे आम्ही दोघांनी कठीण काळाचा सामना केला आहे. म्हणून मी तिचं दु:ख समजतो. तिच्यासाठी स्टारडम गमावणं ही खूप मोठी गोष्ट होती”, असं विक्रम भट्ट म्हणाला.

हे सुद्धा वाचा

“माझ्या करिअरला मोठा फटका”

अभिनेत्री सुष्मिता सेनशी ब्रेकअप झाल्यानंतर विक्रम भट्टने अमीषाला डेट करण्यास सुरुवात केली होती. 2006 मध्ये ‘आँखे’ या चित्रपटात काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या विक्रमच्या 1920 या चित्रपटानंतर दोघांचं ब्रेकअप झालं. या नात्याविषयी बोलताना अमीषा म्हणाली होती, “या इंडस्ट्रीत प्रामाणिकपणाला कोणतीच जागा नाही आणि मी सर्वांत प्रामाणिक व्यक्ती आहे. माझ्या मनात जे असतं तेच माझ्या चेहऱ्यावर दिसतं. पण हाच माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा ड्रॉबॅक ठरला आहे. निश्चितपणे मी फक्त ज्या दोन रिलेशनशिप्समध्ये होती आणि ज्याविषयी मी जाहीरपणे व्यक्त झाले, त्यांचाच माझ्या करिअरला मोठा फटका बसला. आता गेल्या 12-13 वर्षांपासून माझ्या आयुष्यात कोणीच नाही. फक्त शांतता आहे. मला माझ्या आयुष्यात दुसरं काहीच नकोय.”

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.