AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गर्दी दिसली की एक अनामिक भीती वाटते..’; पहलगाम हल्ल्यानंतर विशाखा सुभेदारकडून भावना व्यक्त

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर अभिनेत्री विशाखा सुभेदारने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून तिने हल्ल्यानंतरच्या तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. गर्दी दिसली की एक अनामिक भीती वाटते, असं तिने म्हटलंय.

'गर्दी दिसली की एक अनामिक भीती वाटते..'; पहलगाम हल्ल्यानंतर विशाखा सुभेदारकडून भावना व्यक्त
Vishakha SubhedarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 28, 2025 | 10:09 AM

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाचं वातावरण पहायला मिळतंय. या हल्ल्यात 26 पर्यटकांनी आपले प्राण गमावले. काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या निष्पाप पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. एकीकडे दहशतवादाविरोधात आणि घडलेल्या घटनेबद्दल संताप असतानाच दुसरीकडे लोकांच्या मनात भीतीसुद्धा निर्माण झाली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री विशाखा सुभेदारनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. ‘आनंद आणि विरंगुळा मिळावा म्हणून गेलेले पर्यटक, त्याची ही अशी अवस्था व्हावी. हे सगळंच अस्वस्थ करणारं आहे,’ असं तिने लिहिलंय.

विशाखा सुभेदारची पोस्ट-

‘इंटरनेट, सोशल मीडिया सध्या सगळीकडे एकाच विषयावर बोलणं सुरू आहे.. पहलगाममध्ये घडलेली भयावह घटना! हिंसेला, आतंकवादाला वृत्ती जबाबदार की मती? “असं व्हायला नको” “तसं व्हायला हवं” “यांनी हे करायला हवं, त्यांनी तसं बोलायला हवं” पण ज्यांच्यावर तो प्रसंग ओढवला त्यांनी काय करायचं? आपलं माणूस गमावल्याचं दुःख, शोक करायचा आणि जाब विचारायचा तर तो कोणाला? ही गमावलेली माणसं येतील का परत?

जात, धर्म, वर्ण, भेद त्याचं केलं जाणारं राजकारण अशा आणि बऱ्याच गोष्टी आहेत. पण एखाद्या निष्पाप माणसाला जीवे मारण्याची वृत्ती ही येते कशी आणि कुठून? ही शिकवण देणारे आणि ती आपल्या चांगल्याचसाठी आहे हे मानणारे यांना कसे थांबवायचे? आनंद आणि विरंगुळा मिळावा म्हणून गेलेले पर्यटक, त्याची ही अशी अवस्था व्हावी. हे सगळंच अस्वस्थ करणारं आहे. गर्दी दिसली की एक अनामिक भीती वाटते. खूप खदखद आहे मनात. राहून राहून सारखे तेच विचार येतात. समजा आपण त्या जागी असतो तर?,’ अशा शब्दांत विशाखाने भावना व्यक्त केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) औपचारिकपणे हाती घेतला आहे. या हल्ल्यासंबंधी पुरावे शोधण्यासाठी तपास मोहीम तीव्र करण्यात आली असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत, असं अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितलं. केंद्रीय गृह विभागाच्या आदेशानंतर एनआयएने जम्मूमध्ये गुन्हा दाखल केला आहे आणि तपासासाठी अनेक पथकं तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल.
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं...
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं....
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण...
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण....
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्...
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्....
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी...
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी....
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय.
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी.
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले...
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले....
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.