रील सुनेशी साखरपुडा, ‘मी टू’मध्ये दिसला खरा चेहरा; आता कुठे आहेत ‘संस्कारी बाबू’जी?

आपल्या भूमिकांमुळे 'संस्कारी बाबूजी' अशी ओळख मिळवलेले अभिनेते आलोक नाथ यांचा आज वाढदिवस आहे. आलोक नाथ यांनी विविध चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. मात्र त्याचसोबत त्यांचं खासगी आयुष्य सतत चर्चेत राहिलं आहे.

रील सुनेशी साखरपुडा, 'मी टू'मध्ये दिसला खरा चेहरा; आता कुठे आहेत 'संस्कारी बाबू'जी?
Alok NathImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 10, 2024 | 1:47 PM

टीव्ही आणि बॉलिवूड विश्वातील प्रसिद्ध अभिनेते आलोक नाथ हे आज (10 जुलै) त्यांचा 68 वा वाढदिवस साजरा करत आहेत. मालिका आणि फिल्म इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारे आलोक नाथ गेल्या काही काळापासून प्रकाशझोतात नाहीत. त्यांनी 1980 मध्ये ‘रिश्ते-नाते’ या मालिकेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. या मालिकेत त्यांनी बाबूजींची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाल्याने पुढेही त्यांना अशाच भूमिका मिळाल्या आणि त्यांची ओळखच ‘संस्कारी बाबूजी’ म्हणून झाली. आलोक नाथ यांनी ‘मैंने प्यार किया’, ‘हम साथ साथ है’ यांसारख्या चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. मात्र गेल्या काही काळापासून ते मोठ्या आणि छोट्या पडद्यापासून दूर आहेत.

आलोक नाथ यांच्यावर गंभीर आरोप

आलोक नाथ यांच्यावर ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत गंभीर आरोप झाले होते. निर्माती आणि लेखिका विनता नंदा यांनी आलोक यांच्यावर थेट बलात्काराचा आरोप केला होता. इतकंच नव्हे तर संध्या मृदुल आणि दीपिका आमीन यांनीसुद्धा त्यांच्यावर गैरवर्तणुकीचा आरोप केला होता. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले होते, “जर मी एखाद्या मुलीची छेडछाड केली असेन, तर ती 25 वर्षांनंतर त्याचा खुलासा का करतेय? ती त्याचवेळी याबद्दल का बोलली नाही?” हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला होता. मात्र या घटनेनंतर ते पुन्हा इंडस्ट्रीत दिसले नाहीत. विनता नंदा यांनी केलेल्या आरोपांविरोधात काही ठोस पुरावे न मिळाल्याने तो केस बंद करण्यात आला होता. मात्र त्यानंतर CINTAA मधून आलोक नाथ यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं.

रील लाइफ सुनेशी साखरपुडा

आलोक नाथ यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, ‘बुनियाद’ या मालिकेत काम करताना त्यांचा जीव अभिनेत्री नीना गुप्ता यांच्यावर जडला होता. या मालिकेत नीना गुप्ता यांनी आलोक नाथ यांच्या सुनेची भूमिका साकारली होती. या दोघांनी साखरपुडासुद्धा केला होता, अशीही चर्चा होती. मात्र काही कारणास्तव या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर आलोक नाथ यांनी 1987 मध्ये आशु सिंह यांच्याशी लग्न केलं होतं. त्या ‘बुनियाद’ या मालिकेच्या प्रॉडक्शन असिस्टंट होत्या.

हे सुद्धा वाचा

आलोक नाथ यांचं खासगी आयुष्य बरंच वादग्रस्त राहिलं आहे. 2017 मध्ये त्यांचा मुलगा शिवांग हा दारूच्या नशेत गाडी चालवल्यामुळे चर्चेत होता. हे प्रकरण कोर्टात पोहोचलं होतं. दंड भरल्यानंतर त्यांच्या मुलाची सुटका झाली होती.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.