रिकाम्या पोटी चहा पिण्याचे दुष्परिणाम!

रिकाम्या पोटी चहा अजिबात पिऊ नये, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खरं तर चहाचा pH Value 6 असतो, ज्यामुळे रिकाम्या पोटी चहा प्यायल्यावर आतड्यात एक थर तयार होऊ लागतो. त्यामुळे त्याआधी कोमट गरम पाणी प्यावे. असे केल्याने चहाचा अम्लीय प्रभाव कमी होतो आणि पोटही खराब होत नाही.

रिकाम्या पोटी चहा पिण्याचे दुष्परिणाम!
tea cupsImage Credit source: freepik
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 3:48 PM

मुंबई: असे अनेक लोक असतात ज्यांना सकाळी सर्वात आधी चहा प्यायला आवडतो. चहाशिवाय आपला दिवस सुरू होऊ शकत नाही, असे त्यांना वाटते. पण रिकाम्या पोटी आणि शिळ्या तोंडाने चहा पिणे योग्य आहे का? रिकाम्या पोटी चहा अजिबात पिऊ नये, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खरं तर चहाचा pH Value 6 असतो, ज्यामुळे रिकाम्या पोटी चहा प्यायल्यावर आतड्यात एक थर तयार होऊ लागतो. त्यामुळे त्याआधी कोमट गरम पाणी प्यावे. असे केल्याने चहाचा अम्लीय प्रभाव कमी होतो आणि पोटही खराब होत नाही. आज आम्ही तुम्हाला सकाळी चहा पिण्याचे तोटे सांगत आहोत.

रिकाम्या पोटी चहा पिण्याचे दुष्परिणाम

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने गॅस-अॅसिडिटीची समस्या वाढते. जर तुम्ही नियमितपणे असे करत असाल तर तुमच्या पोटात अॅसिडचे प्रमाण वाढू लागते आणि आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्यानेही तुमचे दात खराब होतात. यामुळे दातांचा बाहेरचा थर खराब होऊन त्यात किडण्याचा धोका वाढतो.

शरीरात पाण्याची कमतरता जाणवू शकते

सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता आणि शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते. यामुळे तुम्हाला चक्कर येऊ शकते आणि बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या वाढू शकते. त्यामुळे चहाच्या आधी पाणी प्यावे. तसेच चहाबरोबर काहीतरी खाण्याची सवय लावा, अन्यथा तुमचे पोट बिघडू शकते.

चहाच्या आधी पाणी कधी प्यावे?

सकाळी चहा पिण्यापूर्वी कोमट पाणी पिणे किती वेळ योग्य आहे, या प्रश्नाने अनेकजण संभ्रमात असतात. तज्ज्ञांच्या मते, सकाळी चहा पिण्याच्या 10-15 मिनिटे आधी पाणी पिणे योग्य मानले जाते. असे केल्याने चहाचा अम्लीय परिणाम शरीरावर खूप कमी होतो. चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये याची विशेष काळजी घ्या.

आपण दररोज किती वेळा चहा प्यावा?

चहा प्यायल्यानंतर पाणी प्यावंसं वाटत असेल तर साधारण अर्धा तास वेळ द्या. यानंतरच तुम्ही पाणी प्या किंवा काही थंड पदार्थ किंवा फळे खा. तसे न केल्यास दात किडणे किंवा सर्दीच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. दिवसभरात किती चहा प्यावा याबद्दलही अनेकजण संभ्रमात असतात. दिवसभरात जास्तीत जास्त एक ते दोन कप चहा प्यायला हवा, त्यापेक्षा जास्त नाही. असे केल्याने पोटाचे नुकसान होऊ शकते.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.