सावधान.. उन्हाळ्यात चुकूनही पिऊ नका गारेगार पाणी, अन्यथा शरीराला या आजारांचा धोका

Cold Water Disadvantages: थंड पाणी तुमच्या आरोग्याला किती हानी पोहोचवू शकते, हे तुम्हाला माहित आहे का ? थंड पाणी प्यायल्याने आराम मिळत असला तरी ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

सावधान.. उन्हाळ्यात चुकूनही पिऊ नका गारेगार पाणी, अन्यथा शरीराला या आजारांचा धोका
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 4:32 PM

नवी दिल्ली : रणरणता उन्हाळा (hot summer) सुरू झाला आहे. उन्हाळ्यातील कडक उन्हामुळे आणि भीषण गरमी यामुळे आपणा सर्वांच्याच अंगातून भरपूर घाम येतो आणि घसा कोरडा पडू लागतो. आपल्या शरीरातील पाणी कमी होऊ लागते व त्यामुळे आपल्याला वारंवार तहान (feeling thirsty) लागते. तहान शमवण्यासाठी बहुतेक लोक उन्हाळ्यात थंड पाणी (cold water) किंवा एखादे थंड पेय पिणे पसंत करतात. कारण त्यामुळे गारेगार वाटतेच आणि शमवतेच, पण उष्णतेपासून काही प्रमाणात आरामही मिळतो.

जेव्हा गरमी वाढते, तेव्हा त्यापासून वाचण्यासाठी बरेचदा लोकंही थंड पाणी पितात. पण थंड पाणी तुमच्या आरोग्याला किती हानी पोहोचवू शकते, हे तुम्हाला माहित आहे का ? थंड पाणी प्यायल्याने आराम मिळत असला तरी ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. थंड पाणी प्यायल्याने तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते ते जाणून घेऊया.

थंड पाणी प्यायल्याने उद्भवू शकतात शकतात या समस्या –

  1. थंड पाणी प्यायल्याने हृदयाच्या ठोक्यांच्या गतीवर परिणाम होतो. हे पाणी शरीराच्या मज्जासंस्थेचे संतुलन बिघडवण्याचे काम करू शकते.
  2. चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढली आहे. अशा परिस्थितीत अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्यास लठ्ठपणा अधिक वेगाने वाढू शकतो. यामुळेच अनेक आहारतज्ञ जेवल्यानंतर लगेच थंड पाणी पिणे टाळण्याचा सल्ला देतात.
  3. बाहेरच्या कडक उन्हातून घरी आल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्यास सर्दी, खोकला, सर्दी अशा समस्या होऊ शकतात. या आजारांपासून दूर राहण्यासाठी उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका. जर तुम्हाला पाणी प्यायचे असेल तर सामान्य पाणी प्या. वास्तविक, थंड पाण्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात श्लेष्मा निर्माण होऊ लागतो, त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका वाढतो.
  4. फ्रीजचे थंड पाणी प्यायल्याने मोठे आतडे आकुंचन पावू शकते. त्यामुळे सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नाही आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. बद्धकोष्ठता हा अनेक आजारांशी जोडला गेला आहे, ज्याच्या भविष्यात आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
  5. खूप थंड पाणी प्यायल्याने शरीरातील पेशीही आकसतात आणि त्यांचे काम नीट करू शकत नाहीत. त्याचा चयापचय आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
  6. थंड पाणी प्यायल्याने तुमचा घसाही खराब होऊ शकतो. तसेच पचनाशी संबंधित समस्याही उद्भवू शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. हे उपाय अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. )

'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.