AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alcohol: अचानक दारु सोडताय, बातमी वाचा अन् निर्णय घ्या, आरोग्याच्या दृष्टीने डॉंक्टरांचा सल्ला महत्वाचा..!

अल्कोहोल हा चांगल्या आरोग्याचा शत्रू मानला जातो आणि हे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. दारूचे दुष्परिणाम जेव्हा तीव्र जाणवतात, तेव्हा बरेच लोक अचानक दारू सोडतात. असे केल्याने शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या, सविस्तर माहिती.

Alcohol:  अचानक दारु सोडताय, बातमी वाचा अन् निर्णय घ्या, आरोग्याच्या दृष्टीने डॉंक्टरांचा सल्ला महत्वाचा..!
सांकेतिक छायाचित्र
| Updated on: Sep 03, 2022 | 10:00 PM
Share

मुंबई : ‘दारू पिणे आरोग्यास हानिकारक (Harmful to health) आहे’ हा इशारा पिणाऱ्यांसह तुम्ही अनेक ठिकाणी वाचला आणि ऐकला असेल. काही लोक ते मोठ्या प्रमाणात दारू घेतात तर काही लोक अधूनमधून. जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे जनरल मेडिसिन कन्सल्टंट डॉ. रोहन सेकिरा यांच्या मते, आपले शरीर एका तासात फक्त एक पेय आणि दिवसात एकूण 3 पेये पचवू शकते, परंतु एकापेक्षा जास्त प्रमाणित पेये (Certified Beverages) पिणे नेहमीच चुकीचे आणि आरोग्यास घातक आहे. जर एखाद्याला दारू पिल्याने आरोग्याचा त्रास होत असेल तर तो दारू पिणे बंद करतो. पण, तुम्हाला माहीत आहे का? की, जर एखाद्याने अचानक दारू पिणे बंद (Stop drinking alcohol) केले तर काय होते? तेव्हा बरेच लोक अचानक दारू सोडतात. असे केल्याने शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या, सविस्तर माहिती.

तुम्ही दारू पिणे बंद करता तेव्हा काय होते?

जर तुम्ही दारू सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या कारण शरीराला दीर्घकाळ दारू पिण्याची सवय असेल आणि ती अचानक बंद केली तर शरीराची यंत्रणा बिघडू शकते. तुमचे डॉक्टर तुम्हाला अल्कोहोल सोडण्याचा योग्य मार्ग सांगतील. डेलीस्टारच्या मते, जेव्हा तुम्ही अचानक अल्कोहोल घेणे बंद करता तेव्हा त्याचे परिणाम शरीरावर दिसू शकतात.

मानसिक स्वास्थ्यही योग्य राहील

जर तुम्ही दारू सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर तुमचे मानसिक आरोग्यही खूप सुधारेल. खरं तर, दररोज जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने मेंदूतील रसायनांच्या कामात व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे मेंदूचे अनेक आजार होतात. दुसरीकडे, डॉक्टरांचा सल्ला घेऊन हळूहळू दारू पिणे बंद केले, तर मेंदूतील रसायने चांगले काम करतील आणि मनही शांत राहील.

याशिवाय शरीरात अधिक ऊर्जा जाणवेल, झोप चांगली येईल, कामावर लक्ष केंद्रित करता येईल, त्वचा चांगली राहील, वजन कमी होईल, दैनंदिन कामावर परिणाम होणार नाही.

दारू सोडण्याचे दीर्घकालीन फायदे कोणते

दारू पिऊन शरीराचे किती नुकसान होते हे सर्वश्रुत आहे. जर कोणी सतत मद्यपान करत असेल तर त्याला अनेक जीवघेणे आजार देखील होऊ शकतात. पण दुसरीकडे, जर कोणी दारू पिणे बंद केले तर त्याला अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होऊ शकतो.

दारू सोडल्यावर तुमचे शरीर किती काळ सामान्य होते?

अहवालानुसार, तुमचे वय, वजन आणि मद्यपानाची सवय तुमचे शरीर किती लवकर योग्य प्रतिसाद देईल यावर अवलंबून असेल. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती बऱ्याच काळापासून खूप मद्यपान करत असेल तर अल्कोहोल सोडल्यानंतर त्याचे शरीर सामान्य होण्यास अधिक काळ जावू द्यावा लागेल.

बहुतेक प्रकरणांमध्ये, शरीराला अल्कोहोलपासून मुक्त होण्यासाठी सुमारे एक आठवडा लागतो. तुम्ही बऱ्याच वर्षापासून भरपूर दारू घेतली असल्यास, सोडल्यानंतर तुमच्या शरीराला सामान्य स्थितीत येण्यासाठी काही महिने लागू शकतात.

दारूचा शरीरावर काय परिणाम होतो?

दारू पिण्याचे शरीराला होणारे नुकसान सर्वांनाच माहीत आहे. ज्या दिवसापासून तुम्ही दारू(अल्कोहोल) प्यायला सुरवात करता तेव्हापासून त्याचे दुष्परिणाम शरीरावर वर्चस्व गाजवू लागतात. दारू पिणाऱ्या लोकांच्या शरीरात हे परिणाम दिसू लागतात. यापैकी काही दीर्घकाळानंतर जाणवतात तर, काही लवकर जाणवू लागतात.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.