AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Side Effect of Skipping Dinner : वजन कमी करण्याच्या नादात तुम्हीही करताय का ही चूक? व्हा सावध, अन्यथा होईल गंभीर नुकसान

वजन नियंत्रित करण्यासाठी बरेच लोक रात्रीचे जेवण करत नाहीत, यामुळे त्यांच्या आरोग्यावर अनेक गंभीर परिणाम होतात. म्हणूनच रात्रीचे जेवण कधीही टाळू नये.

Side Effect of Skipping Dinner : वजन कमी करण्याच्या नादात तुम्हीही करताय का ही चूक? व्हा सावध, अन्यथा होईल गंभीर नुकसान
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 27, 2023 | 10:13 AM
Share

नवी दिल्ली – वजन कमी (weight loss) करणाऱ्यांना डाएटिंग (dieting) आणि उपवास करण्याची पद्धत सर्वात सोपी वाटते. तुम्हाला त्याचा परिणाम नक्कीच दिसतो, पण तो सकारात्मक कमी आणि जास्त नकारात्मक असतो. कारण अन्नं न खाल्ल्याने शरीरासोबतच मनावरही परिणाम होतो. जिथे शारीरिक दुर्बलतेची भावना असते, तिथे मानसिकदृष्ट्या व्यक्ती चिडचिड होते. त्यामुळे वजन नियंत्रणाच्या प्रक्रियेत कोणतेही जेवण करणे (dont skip meals) टाळू नका, मग ते रात्रीचे असले तरीही. त्याऐवजी तुम्ही हलकं-फुलकं काही खाऊ शकता, तो एक चांगला पर्याय आहे. बरेच जण रात्रीचे जेवण करणे टाळतात, पण त्यामुळे आरोग्याचे काय नुकसान होते ते जाणून घेऊया.

होऊ शकतो पोटदुखीचा त्रास

जे लोक रात्रीचे जेवण करत नाहीत, त्यांना अनेकदा पोटदुखीचा त्रास होतो. कधीकधी ही वेदना इतकी तीव्र असते की ती सहन करणे कठीण होते. त्यामुळे रात्रीचे जेवण करणे टाळण्यापेक्षा त्यावेळी हलके अन्न घेणे चांगले. तुम्ही फायबर युक्त पदार्थ खाऊ शकता. एक वाटी वरण किंवा उकडलेल्या भाज्यांचे सेवन तुम्ही करू शकता. रात्रीच्या जेवणात असे खाद्यपदार्थ निवडा, जे सहज पचतील आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहील.

अशक्तपणा येऊ शकतो

एक-दोन दिवस रात्रीचे जेवण जेवला नाहीत तर फारसा फरक पडत नाही, परंतु दररोज असे केल्याने अशक्तपणा येऊ शकतो. खरंतर ज्यांना लठ्ठपणा किंवा वजन कमी करायचे असते, तेच लोक रात्रीचे जेवण वगळतात. रात्रीच्या जेवणासोबतच अनेक वेळा ते नाश्ता करणेही टाळतात. मात्र या चक्रात शरीर कमकुवत होते. तुमच्या या सवयीचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

झोप न येण्याची समस्या वाढू शकते

या सर्व गोष्टींशिवाय रात्री जेवण न केल्यामुळे झोप न येण्याची समस्याही वाढू शकते. कारण जसजशी रात्र वाढत जाते तसतशी भूक लागते, त्यामुळे अनेकदा पोटात तीव्र वेदना होतात. अशा स्थितीत झोप येत नसेल किंवा झोप लागली तर भुकेमुळे पुन्हा झोप जाग येते. शांत झोप न लागल्याने किंवा अपूर्ण झोपेमुळे आपली संपूर्ण दिनचर्या बिघडते.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.