AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंडो-जर्मन पार्टनरशीपवर पंतप्रधान मोदी यांचं ऐतिहासिक भाषण; भारताला विकासाच्या शिखरावर नेण्याचं आवाहन

जर्मनी भारताचा एक विश्वासू भागिदार आहे. सध्या जर्मनीच्या भारतात 1800 हून अधिक कंपन्या सक्रिय आहेत. जवळपास तीन लाख भारतीय जर्मनीत राहतात. आणि 50 हजार विद्यार्थी जर्मनीच्या विद्यापीठांमधून शिक्षण घेत आहेत.

इंडो-जर्मन पार्टनरशीपवर पंतप्रधान मोदी यांचं ऐतिहासिक भाषण; भारताला विकासाच्या शिखरावर नेण्याचं आवाहन
PM ModiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 22, 2024 | 11:16 PM

न्यूज9 ग्लोबल समिटच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडो-जर्मन पार्टनरशीपवर ऐतिहासिक भाषण दिलं. भारत आणि जर्मनीची भागिदारी म्हणजे नव्या युगाची सुरुवात आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. इंडो जर्मन पार्टनरशीपची प्रासंगिकता आणि त्याच्या व्यापक शक्यतांवरही त्यांनी चर्चा केली. दोन्ही देश आर्थिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील नव्या शिखरावर जाण्यास दोन्ही देश अग्रेसर असतानाच मोदींनी हे विधान केल्याने त्याला अधिक महत्त्व आलं आहे.

इंडो-जर्मन पार्टनरशीपमध्ये आज एक नवा अध्याय जोडलागेला आहे. ही भागीदारी म्हणजे दोन्ही देशांची जबाबदारी आणि दीर्घकालिक सहभागाचं प्रतिक आहे. या भागिदारीला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. दोन्ही देशाचं नातं ऐतिहासिक आणि स्थिर असल्याचंच यातून दिसून येतं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

तेलुगू आणि तमिळ भाषेतील पुस्तके प्रकाशित करणारा जर्मनी हा यूरोपातील पहिला देश आहे. आमचं सांस्कृतिक नातं अनेक शतकांपूर्वीचं आहे. यूरोपातील पहिलं संस्कृत ग्रामर सुद्धा एका जर्मन विद्वानाने लिहिलं होतं, याकडेही मोदी यांनी लक्ष वेधलं.

विश्वासाची भागिदारी

जर्मनी भारताचा एक विश्वासू भागिदार आहे. सध्या जर्मनीच्या भारतात 1800 हून अधिक कंपन्या सक्रिय आहेत. जवळपास तीन लाख भारतीय जर्मनीत राहतात. आणि 50 हजार विद्यार्थी जर्मनीच्या विद्यापीठांमधून शिक्षण घेत आहेत. जर्मनीने फोकस ऑन इंडिया डॉक्यूमेंट्स प्रकाशित केलं आहे. त्यावरून जग भारताकडे स्ट्रॅटेजिक आणि टेक्नॉलॉजिकल हब म्हणून पाहत असल्याचं दिसून येत आहे, असंही मोदी म्हणाले.

रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म

पंतप्रधानांनी गेल्या दहा वर्षातील भारतातील विकासावर प्रकाश टाकला. आम्ही रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मच्या मंत्रानुसार प्रत्येक क्षेत्रात धोरणात्मक बदल घडवून आणले आहेत. 30 हजाराहून अधिक अनुपालनांना रद्द केलं आहे. जीएसटीच्या माध्यमातून टॅक्स सिस्टिम सुटसुटीत केली आहे. आम्ही भारतातील बँकिंग सिस्टिम मजबूत केली आहे. बिझनेससाठी प्रोग्रेसिव्ह आणि स्टेबल पॉलिसी मेकिंग वातावरण तयार केलं आहे. ही सुधारणा भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी अत्यंत मैलाचा दगड ठरला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

उद्योग… भारताची ताकद

भारताच्या विनिर्माण क्षेत्रातील प्रगतीचाही त्यांनी आढावा घेतला. भारत जगातील सर्वात मोठा टू व्हिलर निर्माता आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा स्टिल आणि सिमेंट निर्मिती करणारा देश आहे. चौथा सर्वात मोठा फोर व्हिलर निर्मिती करणारा देश आहे. भारतातील सेमी कंडक्टर इंडस्ट्रीही जागतिक पटलावर दखल घेण्याजोगी होणार आहे, असं ते म्हणाले.

डिजिटल क्षेत्रातील गुंवतणूक

भारत भौतिक, सामाजिक आणि डिजिटल संरचनेत वेगाने गुंतवणूक करत आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा आणि अत्यंत अनोखा असा डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असणारा देश आहे, असंही मोदींनी स्पष्ट केलं. या सर्व प्रयत्नांमुळेच भारत आज गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र बनल्याचंही ते म्हणाले.

या व्यवसाय सुरू करा

यावेळी मोदींनी जर्मनीच्या कंपन्यांना भारतात गुंतवणूक आणि व्यवसाय करण्याचं आमंत्रण दिलं. ज्या जर्मन कंपन्या भारतात आल्या नाहीत, त्यांना मी भारतात येण्याचं आमंत्रण देत आहे, असं सांगतानाच त्यांनी भारतातील धोरणं आणि वाणिज्यिक स्थिरतेवरही जोर दिला.

मॅन्युफॅक्चरिंग आणि टेक्नॉलॉजी सहकार्य

भारत आणि जर्मनी दरम्यान मॅन्युफॅक्चरिंग, इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंगचच्या क्षेत्रात सहकार्याची मोठी शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही जर्मनीसोबत मिळून जगाच्या समृद्ध भविष्यासाठी योगदान देणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

वैभवी देशमुख वाढदिवशी वडिलांच्या आठवणीने भावुक
वैभवी देशमुख वाढदिवशी वडिलांच्या आठवणीने भावुक.
रत्नागिरीच्या खोल समुद्रात होणार मॉक ड्रिल, बघा कशी सुरुये तयारी?
रत्नागिरीच्या खोल समुद्रात होणार मॉक ड्रिल, बघा कशी सुरुये तयारी?.
हल्ल्यानंतर ओवैसी पहिल्यांदा काश्मीरमध्ये; म्हणाले, 'भारत सरकारने ..'
हल्ल्यानंतर ओवैसी पहिल्यांदा काश्मीरमध्ये; म्हणाले, 'भारत सरकारने ..'.
युद्धाचं सावट, महाराष्ट्रातील ही 3 शहरं अतिसंवेदनशील, विशेष तयारी काय?
युद्धाचं सावट, महाराष्ट्रातील ही 3 शहरं अतिसंवेदनशील, विशेष तयारी काय?.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्याला 'सुप्रीम' आदेश काय
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्याला 'सुप्रीम' आदेश काय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत महत्वाची बैठक.
अमरनाथ : बाबा बर्फानीचं घ्या पहिलं दर्शन, यंदा शिवलिंगांची उंची किती?
अमरनाथ : बाबा बर्फानीचं घ्या पहिलं दर्शन, यंदा शिवलिंगांची उंची किती?.
पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा भारतीय सीमेच्या मार्गावर
पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा भारतीय सीमेच्या मार्गावर.
बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या घरीच केलं जात होतं गांजाचं सेवन
बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या घरीच केलं जात होतं गांजाचं सेवन.
महाराष्ट्रात कुठे-कुठे होणार उद्या मॉकड्रिल? बघा तुमचा जिल्हा आहे का?
महाराष्ट्रात कुठे-कुठे होणार उद्या मॉकड्रिल? बघा तुमचा जिल्हा आहे का?.