AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam Terror Attack : भारताने उत्तर देण्याआधीच पाकिस्तानचे धाबे दणाणले, पाकिस्तानी एअरबेसवर काय घडतय?

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पेहेलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने अजून उत्तर दिलेलं नाही. पण पाकिस्तान टेन्शनमध्ये आलाय. याआधी त्यांनी भारत काय करु शकतो? याचा अनुभव घेतला आहे. तिथल्या एअर बेसवर काय हालचाली सुरु आहेत? त्याचे फोटो समोर आलेत.

Pahalgam Terror Attack : भारताने उत्तर देण्याआधीच पाकिस्तानचे धाबे दणाणले, पाकिस्तानी एअरबेसवर काय घडतय?
Pakisnan Air base Movement
Follow us
| Updated on: Apr 23, 2025 | 1:04 PM

जम्मू-काश्मीरच्या पेहेलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला अजून भारताने उत्तर दिलेलं नाही. पण हे उत्तर देण्याआधीच पाकिस्तान दहशतीच्या सावटाखाली आहे. पाकिस्तानने बॉर्डरच्या आस-पास मिलिट्री तैनाती वाढवली आहे. सोशल मीडियावरुन हे दावे केले जात आहेत. पाकिस्तानकडून फायटर जेट्सची तैनाती केली जात आहे. पाकिस्तानने अजून यावर पुष्टी केलेली नाही. सोशल मीडियावर फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइट रडार 24 चे अनेक स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत. यात पाकिस्तान एअरफोर्सची (PAF) विमानं कराची येथील दक्षिणी बेसवरुन लाहोर आणि रावळपिंडीच्या उत्तरेला असलेल्या एअरबेसच्या दिशेने उड्डाण करत आहेत. रावळपिंडीमध्ये PAF चा नूर खान बेस आहे. पाकिस्तानचा हा प्रमुख ऑपरेशनल बेस आहे.

दुसऱ्या व्हायरल पोस्टमध्ये PAF101, एक छोटं एम्ब्रेयर फेनोम 100 जेट उड्डाण करताना दिसतय. VIP ट्रान्सपोर्ट किंवा सिक्रेट ऑपरेशन्ससाठी या विमानांचा वापर केला जातो. पाकिस्तान या सगळ्या हालचालींवर मौन बाळगून आहे. जम्मू-काश्मीरच्या पेहेलगाममध्ये झालेला हल्ला हा ISI ने भारतासोबत मर्यादीत संघर्ष सुरु करण्याच्या इराद्याने केलाय असे दावे सोशल मीडियावर केले जात आहेत. भारताला डिवचून पाकिस्तानात काही जणांनी आपली राजकीय पोळी भाजण्याची तयारी चालवली आहे.

अशी भिती पाकिस्तानला

2019 साली पुलवामा दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने थेट बालकोटमध्ये एअर स्ट्राइक करुन या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं होतं. 1971 नंतर पहिल्यांदाच त्यावेळी भारतीय फायटर जेट्स पाकिस्तानात घुसली होती. एक दहशतवादी प्रशिक्षण तळ भारतीय जेट्सनी उद्धवस्त केला होता. आताही भारताकडून अशाच प्रकारची कारवाई होईल अशी भिती पाकिस्तानला आहे.

अर्थव्यवस्थेवर आघात करण्याचा डाव

आता जम्मू-काश्मीरच्या पेहेलगाम येथे हल्ला झाला आहे. काश्मीर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना लक्ष्य करण्यात आलं आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. भारतावर झालेला हा सर्वात मोठा वार आहे. काश्मीरच्या अर्थव्यवस्थेवर आघात करण्याचा डाव यामागे आहे. या कटामागे जे आहेत, त्यांना सोडणार नाही, हे भारताने आधीच स्पष्ट केलय. भारताने याआधी दोनवेळा पाकिस्तानात घुसून कारवाई केली आहे.

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.