AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Pakistan : पाकिस्तानचे हे 3 विभाग रडारवर, घाबरलेल्या शहबाज सरकारने इमर्जन्सीमध्ये उचललं असं पाऊल

India vs Pakistan : पाकिस्तान सध्या प्रचंड तणावाखाली आहे. हल्ला कुठून, कसा होईल याची त्यांना कल्पना नाहीय. पाकिस्तानात वक्तव्यांचा पूर आला आहे. पण भारतात मात्र शांतता आहे. पाकिस्तानला ठाऊक आहे ही वादळापूर्वीची शांतता आहे. म्हणून पाकिस्तानच्या शहबाज सरकारने इमर्जन्सीमध्ये एक पाऊल उचललं आहे.

India vs Pakistan : पाकिस्तानचे हे 3 विभाग रडारवर, घाबरलेल्या शहबाज सरकारने इमर्जन्सीमध्ये उचललं असं पाऊल
India vs Pakistan Image Credit source: TV9 Hindi
Follow us
| Updated on: Apr 29, 2025 | 11:08 AM

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचे नेते, विभाग आणि क्षेत्र दहशतीच्या सावटाखाली आहेत. भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे, त्यामुळे पाकिस्तानच टेन्शन आणखी वाढलं आहे. दहशतवादाचे आश्रय दाते असलेल्या पाकिस्तानचे यावेळी उपचार होणं निश्चित आहे. भारताने सर्वप्रथम सिंधू जल करार स्थगित करुन पाकिस्तानला जखमी केलय. त्याशिवाय भारताने वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय घेऊन पाकिस्तानच नुकसान केलय. यात पाकिस्तानींना देशाबाहेर काढणं. पाकिस्तानातील युट्यूब चॅनल बंद करणं असे निर्णय आहेत. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सायबर आपातकालीन प्रतिक्रिया टीमने (NCERT) पायाभूत इन्फ्रास्ट्रक्चरला निशाणा बनवून सायबर हल्ल्याचा धोका वाढू शकतो असा इशारा दिला आहे. त्यासाठी त्यांनी दक्षिण आणि मध्य आशियातील वाढत्या तणावाचा हवाला दिला आहे. एक्सप्रेस न्यूज रिपोर्टने हे वृत्त दिलय.

भारत यावेळी सोडणार नाही, ही चिंता पाकिस्तानला लागून राहिली आहे. म्हणून ते वारंवार आम्ही तयार आहोत, अशी युद्धाची भाषा करत आहेत. भारत यावेळी त्यांना सर्वबाजूंनी मारु शकतो ही भिती त्यांच्या मनात आहे. सोमवारी पाकिस्तान सरकारकडून एक एडवायजरी जारी करण्यात आली. त्यात म्हटलय की, “हॅकर्स पाकिस्तान विरुद्ध सायबर हल्ले सुरु करण्यासाठी सध्याच्या क्षेत्रीय स्थितीचा फायदा उचलू शकतात” “सरकारी संस्था आणि संवेदनशील पायाभूत इन्फ्रास्ट्रक्चर सायबर हल्ल्याच प्रमुख लक्ष्य असू शकतं” असं एडवायजरीमध्ये म्हटलं आहे.

कोणाला लक्ष्य केलं जाऊ शकतं?

सायबर हल्ल्यामध्ये संरक्षण, आर्थिक आणि मीडिया संस्थांना लक्ष्य केलं जाऊ शकतं असं एजन्सीने म्हटलं आहे. हल्लेखोर सुरक्षाप्रणाली तोडण्यासाठी स्पीयर फिशिंग, मॅलवेयर आणि डीपफेक रणनीतीचा अवलंब करु शकतात असं एडवायजरीमध्ये म्हटलं आहे. हॅकर्स गोपनीय म्हणजे पाकिस्तानचे सिक्रेट चोरु शकतात असा इशारा दिला आहे. अधिकाऱ्यांनी संस्थांना सायबर सुरक्षा कवच अधिक मजबूत करण्यास आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्तक राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे सध्या संपूर्ण भारतात संतापाच वातावरण आहे. सर्वच थरातून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी होत आहे. पहलगाम हल्ल्यात भारताच्या 26 पर्यटकांची निर्घृण हत्या करण्यात आली.

'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल.