दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत ब्रिटीश संसदेत चर्चा, भारत सरकारकडून तीव्र विरोध

शेतकरी आंदोलनाबाबत ब्रिटीश संसदेत एक विशेष चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मंगळवार परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील ब्रिटन उच्चायुक्तांकडे याबाबत विचारणा केली आणि आपला तीव्र विरोधही दर्शवला.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत ब्रिटीश संसदेत चर्चा, भारत सरकारकडून तीव्र विरोध
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 10:48 PM

नवी दिल्ली : भारतातील कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनाबाबत ब्रिटीश संसदेत एक विशेष चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मंगळवार परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील ब्रिटन उच्चायुक्तांकडे याबाबत विचारणा केली आणि आपला तीव्र विरोधही दर्शवला. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार परराष्ट्र सचिव हर्ष वर्धन श्रृंगला यांनी ब्रिटनच्या उच्चायुक्तांना सांगितलं की, भारतातील कृषी कायद्यांबाबत ब्रिटीश संसदेत चर्चा करणं हे दुसऱ्या लोकशाही देशाच्या राजकारणात डोकावणं आहे.(Indian government oppose to the special debate in the British Parliament on India’s agricultural laws)

परराष्ट्र सचिवांनी ब्रिटनच्या उच्चायुक्तांना एक सल्लाही देऊ केलाय. ब्रिटीश खासदारांना विशेष करुन अन्य लोकशाही देशाशी संबंधित घटनाक्रमांबाबत व्होट बँकेचं राजकारण केलं नाही पाहिजे. यापूर्वी सोमवारी ब्रिटनमध्ये काही खासदारांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत ब्रिटीश संसदेत एका विशेष चर्चेचं आयोजन केलं होतं.

ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तांकडून निषेध

महत्वाची बाब म्हणजे ही चर्चा तेव्हा करण्यात आली, जेव्हा भारतात राजधानी दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. दुसरीकडे लंडनमधील भारताच्या उच्चायुक्तानी ब्रिटीश खासदारांची ही चर्चा म्हणजे एक प्रकारे खोट्या दाव्यांनी भरलेली होती असं म्हटलंय. सोबतच या विशेष चर्चेची निंदाही केली आहे.

दरम्यान, ब्रिटनने यापूर्वी हे स्पष्ट केलं होतं की, कृषी कायदे हा भारताचा अंतर्गत विषय आहे. सोबतच ब्रिटीश सरकारने भारताचं महत्वही अंडरलाईन केलं होतं. भारत आणि ब्रिटन संयुक्त राष्ट्र परिषदेत चांगल्या वातावरणासाठी एकत्र काम करतात, असं ब्रिटनने म्हटलं होतं. सोबतच दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय सहयोग अनेक जागतिक समस्या सोडवण्यासाठी ही मदत करत असतो. अशास्थिती ब्रिटीश संसदेत झालेल्या विशेष चर्चेबाबत भारतानं आपली नाराजी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या :

Delhi Farmer Tractor Rally : ‘पुढे जायचं असेल तर आमच्या अंगावरुन ट्रॅक्टर घाला’, नांगलोईमध्ये शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांचाच ठिय्या

Fact Check : शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरील तिरंगा हटवून आपला झेंडा लावला का? तथ्य काय?

Indian government oppose to the special debate in the British Parliament on India’s agricultural laws

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.