AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळी पावसाचा कहर, देशभरात 35 ते 40 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशभरात गेल्या 24 तासात अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अनेक ठिकाणी गारपीटही झाली. अवकाळी पावसामुळे देशभरात तब्बल 35 ते 40 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एकट्या मध्य प्रदेशात तब्बल 15 जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर गुजरात 11 आणि राजस्थानातील 7 जणांचा अवकाळी पावसाने बळी घेतला.  इकडे महाराष्ट्रातील बुलडाण्यात वीज पडून एका […]

अवकाळी पावसाचा कहर, देशभरात 35 ते 40 जणांचा मृत्यू
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM
Share

नवी दिल्ली : देशभरात गेल्या 24 तासात अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अनेक ठिकाणी गारपीटही झाली. अवकाळी पावसामुळे देशभरात तब्बल 35 ते 40 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एकट्या मध्य प्रदेशात तब्बल 15 जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर गुजरात 11 आणि राजस्थानातील 7 जणांचा अवकाळी पावसाने बळी घेतला.  इकडे महाराष्ट्रातील बुलडाण्यात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी आहेत.

राजस्थान, मध्य प्रदेशसह महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, झारखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणासारख्या राज्यांत अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. हवामान विभागाने येत्या दोन दिवसात पुन्हा वादळी-वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या वादळी-वाऱ्याचा आणि गारपिटीचा फटका बसला आहे. पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. दुष्काळापासून त्रस्त शेतकरी या अस्मानी संकटामुळे पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे.

गुजरातमध्ये या वादळी वाऱ्यामुळे 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये आलेल्या या नैसर्गिक संकटाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केलं. “गुजरातमध्ये आलेल्या वादळी-वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचं मला दु:ख आहे. मी प्रार्थना करतो की, जखमी लवकरात लवकर बरे होतील” असं ट्वीट मोदींनी केलं. याशिवाय मोदींनी पीडितांना मदत जाहीर केली. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत मोदींनी जाहीर केली.

मध्य प्रदेशातही या अस्मानी संकाटामुळे 15 लोकांचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनींही ट्विटरवर या नैसर्गिक संकटाबाबत दु:ख केलं. “वीज पडल्याने इंदूर, धार आणि मध्य प्रदेशातील इतर काही ठिकाणी जीवितहानी झाल्याचं समोर आलं आहे. पीडितांसाठी मी दु:ख व्यक्त करतो. या दु:खाच्या परिस्थितीत आमचं सरकार पीडितांसोबत आहे”, असं ट्वीट मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलं.

मध्य प्रदेश आणि गुजरातशिवाय, राजस्थानच्या प्रतापगड आणि झालावड भागातही वादळी-वाऱ्यामुळे लोकांचं जीवन अस्ताव्यस्त झालं आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली, विजेचे खांब पडले. राजस्थानात आतापर्यंत यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला. पंजाबमध्ये 2, हरियाणा 1, झारखंड 1, महाराष्ट्र 1, उत्तर प्रदेश 1 आणि हिमाचल प्रदेशमध्येही एका  व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, हवामान विभागाकडून आज आणि उद्या पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.