AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळ झळा… नाशिकमध्ये 40 मोरांचा तडफडून मृत्यू

नाशिक : संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाने होरपळला आहे. या दुष्काळापासून पशू-पक्षीही वाचू शकलेले नाहीत. त्यातच आता नाशिकमध्ये 40 पेक्षा जास्त मोर या दुष्काळाचे बळी ठरले आहेत. अन्न आणि पाणी न मिळाल्याने या मोरांचा तडफडून मृत्यू झाला आहे. नाशिकच्या चांदवड येथील दहीवड-दीघवड गावात हा धक्कादायक प्रकार घडला. येथे 40 पेक्षा जास्त मोरांचा मृत्यू झाला. या मोरांना वेळेवर पुरेसं अन्न […]

दुष्काळ झळा… नाशिकमध्ये 40 मोरांचा तडफडून मृत्यू
| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM
Share

नाशिक : संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाने होरपळला आहे. या दुष्काळापासून पशू-पक्षीही वाचू शकलेले नाहीत. त्यातच आता नाशिकमध्ये 40 पेक्षा जास्त मोर या दुष्काळाचे बळी ठरले आहेत. अन्न आणि पाणी न मिळाल्याने या मोरांचा तडफडून मृत्यू झाला आहे.

नाशिकच्या चांदवड येथील दहीवड-दीघवड गावात हा धक्कादायक प्रकार घडला. येथे 40 पेक्षा जास्त मोरांचा मृत्यू झाला. या मोरांना वेळेवर पुरेसं अन्न आणि पाणी न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेनंतर वनविभागाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. वनविभागाने दुर्लक्ष केल्याने या मोरांचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. वनविभाग दुर्लक्ष करत असल्याने अखेर या मोरांचं संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांनी स्वत: पाण्याचे साठे तयार केले होते. मात्र, तरीही या मोरांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आलं नाही.

आधीच देशातील जैवविविधता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. वाढत्या आधुनिकीकरणामुळे पशू-पक्षांच्या कित्येक प्रजाती लोप पावल्या आहेत. देशात वाघांची संख्या जेमतेम उरली आहे. त्यामुळे वनविभागाने आता वन्य प्राणीजीवांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

VIDEO :

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.