AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंदरावर उतरण्यास स्थानिकांचा विरोध, डहाणूचे 700 खलाशी समुद्रात अडकले

डहाणू तलासरी भागातील जवळपास 600 ते 700 मच्छीमार कामागर (खलाशी) समुद्रात अडकले (maharashtra sailors stuck in sea) आहेत.

बंदरावर उतरण्यास स्थानिकांचा विरोध, डहाणूचे 700 खलाशी समुद्रात अडकले
| Edited By: | Updated on: Apr 05, 2020 | 5:30 PM
Share

पालघर : डहाणू तलासरी भागातील जवळपास 600 ते 700 मच्छीमार कामागर (खलाशी) समुद्रात अडकले (maharashtra sailors stuck in sea) आहेत. हे सर्व कामगार दरवर्षी गुजरातमधील पोरबंदर, सौराष्ट्र, वेरावळ या भागात कामासाठी जात असतात. गुजरातवरुन पुन्हा सर्वजण घरी म्हणजे आपल्या गावी परतण्यासाठी बोटींनी उंबरगाव येथे पोहोचले. मात्र स्थानिकांनी त्यांना या भागात उतरण्यास विरोध केला. त्यामुळे ते नारगोल बंदरावर गेले तेथेही विरोध झाल्याने ते पुन्हा गुजरातमधील मरोलीपासून पाच नॉटिकल मैल अंतरावर समुद्रात विसावले होते. गेल्या 24 तासांपेक्षा अधिक तास समुद्रात अन्न-पाण्यापासून वंचित असल्याने त्यांचे अतोनात हाल सुरु झाले आहेत. यावेळी त्यांनी संपर्कात असलेल्याशी संपर्क करून मदतीचे (maharashtra sailors stuck in sea) आवाहन केले.

समुद्रात अडकलेल्या सर्वांना गुजरात प्रशासन अन्य ठिकाणी क्वारंटाईन करण्यासाठी नेत होते. परंतु गुजरात प्रशासनाने उंबरगाव याठिकाणी गुजरातमधील स्थानिक खलाशी, कामगाराना उतरवून तपासणी करून महाराष्ट्रातील कामगारांच्या बाबतीत हात वर केले. तसेच त्यांना बोटीतच ठेवण्यात आले. त्यामुळे गुजरातमधून 30 ते 40 मच्छिमार नौका महाराष्ट्राकडे येण्यास निघाल्या होत्या. निघालेल्या मच्छिमार नौका गुजरातमधील नारगोल आणि झाई बंदराकडे आणि काही मच्छिमार नौका महाराष्ट्रातील डहाणू सातपाटी अर्नाळा या भागात येण्याची शक्यता होती. त्यामुळे महाराष्ट्रात आल्यास त्यांची समुद्रामध्येच तपासणी करुन प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली.

गुजरात प्रशासनाने गुजरातीमधील कामगार, खलाशी यांची तपासणी करुन त्यांची व्यवस्था केली. पण महाराष्ट्रातील खलाशी, कामगार वर्गाच्या जीवाशी खेळ सुरु केला.

बोटीतील महाराष्ट्रामधील तलासरी आणि डहाणू तालुक्याच्या खलाशांना किनाऱ्यावर उतरवून घेण्यासाठी गुजरात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी हात वर केले. त्यामुळे पाचशे खलाशांचा परतीचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच खलाशांना पुन्हा गुजरात राज्यातील मुंद्रा बंदरांमध्ये नेण्याच्या प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुजरात-महराष्ट्र प्रशासनाने नक्कीच कठोर पावलं उचलावीत. मात्र हातावर पोट असणाऱ्या आणि लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगारांची जेवण व्यवस्थेसह राहण्याची योग्य सोय करावी. तसेच सीमेजवळील नागरिकांनी त्यांची तपासणी करुन त्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.