AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Election Result : बिहारमध्ये एमआयएम किंगमेकर ठरणार? 4 जागांवर विजय, तर एका ठिकाणी आघाडीवर

बिहारचा निकाल त्रिशंकू लागला तर एमआयएम किंग मेकर ठरणार असल्याची शक्यता आहे.

Bihar Election Result : बिहारमध्ये एमआयएम किंगमेकर ठरणार? 4 जागांवर विजय, तर एका ठिकाणी आघाडीवर
| Updated on: Nov 10, 2020 | 11:25 PM
Share

पाटणा : बिहारच्या निवडणुकीत जवळपास सर्वच एक्झिट पोल खोटे ठरले आहेत. सुरुवातीला स्पष्ट राजदकडे आणि नंतर बराच काळ भाजपकडे झुकलेली ही निवडणूक आता त्रिशंकू होण्याच्या दिशाने प्रवास करत आहेत. या सर्व घडामोडीमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाला मोठं यश मिळालं आहे. एमआयएमने 4 जागांवर विजय मिळवला असून एका जागेवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे बिहारचा निकाल त्रिशंकू लागला तर एमआयएम किंग मेकर ठरणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ओवेसींचा पक्ष कुणाला पाठिंबा देणार हे पाहावं लागणार आहे (AIMIM big victory in Bihar Assembly Election 2020).

“सीमांचलच्या नागरिकांचं मनापासून आभार मानतो. बिहारमध्ये आम्ही जेव्हा आमच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हापासून आम्ही सीमांचलच्या नागरिकांना न्याय देणार असं सांगत आलो आहोत. गेल्या 60 वर्षात सीमांचलच्या नागरिकांना योग्य न्याय मिळाला नाही. हा प्रांत फक्त बिहारच नाही, तर संपूर्ण भारतातील सर्वाधिक अविकसित भाग आहे. न्यायाची लढाई सुरु राहील. आम्ही येथे शाळा, महाविद्यालय, चांगले रुग्णालय उभारणार आहोत”, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी दिली (AIMIM big victory in Bihar Assembly Election 2020).

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट होत आहे. या निवडणुकीत एमआयएम पक्षाला 4 जागांवर यश आलं आहे. तर 1 जागेवर एमआयएम आघाडीवर आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बिहारच्या जनतेचं आणि मित्र पक्षांचे आभार मानले. त्याचबरोबर बिहारमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेले हैदराबाद, बिहार आणि महाराष्ट्रातील एमआयएमच्या नेत्यांचे आभार मानले (AIMIM big victory in Bihar Assembly Election 2020).

‘या’ जागांवर एमआयएमची बाजी

बिहारच्या अमौर, कौचाधामन यासह एकूण 4 मतदारसंघांमध्ये एमआयएमचे उमेदवार जिंकले आहेत. अमौर मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार अख्तरुल इमान यांना तब्बल 85 हजार 391 मतं मिळाली आहेत. तर कौचाधामन मतदारसंघात मोहम्मद इजहर अस्फी यांना 79 हजार 548 मतं मिळाली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly election 2020) एमआयएम पक्षाने 20 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे केले आहेत. विशेष म्हणजे मुस्लिम मतदार सर्वाधिक असणाऱ्या सीमांचल प्रांतात एमआयएमने आपले 14 उमेदवार उभे केले होते.

विशेष म्हणजे 2015 च्या विधानसभा निवडणुकीत सीमांचल प्रांतात काँग्रेसला सर्वाधिक जागांवर यश मिळालं होतं. काँग्रेसने या प्रांतात 9 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर जेडीयूने 6 तर आरजेडीने 3 जागांवर विजय मिळवला होता. भाजपने या प्रांतात 6 तर भाकपाला 1 जागेवर समाधान मानावं लागलं होतं.

एमआयएमने 2015 च्या विधानसभा निवडणुकीत सीमांचल प्रांतात 6 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यावेळी एमआयएमच्या हाती फारसं यश आलं नव्हतं. पण कोचाधामन मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार अख्तरुल इमान दुसऱ्या नंबरवर होते.

दरम्यान, 2019 साली किशनगंज येथे झालेल्या पोटनिवडणुकीत एमआयएमने जोर लावला होता. अखेर त्या पोटनिवडणुकीत आपलं खातं खोलण्यात एमआयएमला यश आलं होतं. सध्या सीमांचल प्रांतात भाजपचे उमेदवार आघाडीवर दिसत आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकार काँग्रेस तर तिसऱ्या क्रमांकावर एमआयएमचे उमेदार आघाडीवर दिसत आहेत.

संबंधित बातम्या :

Bihar Election Result 2020! 50 लाखांची मतमोजणी अद्याप बाकी, कधीही चित्र पालटण्याची शक्यता

Bihar Election Result 2020 LIVE | नितीश कुमारांकडून निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव, राजदचा गंभीर आरोप

Bihar Election Result ! नितीशकुमारांचं नंबर वनचं स्वप्न भंगलं; चिराग पासवान ठरले ‘जाएंट किलर’!

संबंधित व्हिडीओ :

Asaduddin Owaisi Party AIMIM may become King Maker in Bihar Election Result 2020

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.