AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय अर्थव्यवस्थेत मोठी वाढ, जगाला टाकले मागे, 2 वर्ष आसपासही नाही

भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ पाहून संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले आहे. IMF नंतर आशियाई विकास बँकेनेही भारताचा विकास दर 7 टक्के केला आहे. भारताचा विकासदर केवळ या वर्षीच नव्हे तर पुढील वर्षीही सर्वोच्च असेल, असा विश्वास एडीबीने व्यक्त केला आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेत मोठी वाढ, जगाला टाकले मागे, 2 वर्ष आसपासही नाही
indian economyImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jul 17, 2024 | 6:02 PM
Share

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) नंतर आता आशियाई विकास बँकेने (ADB) देखील भारतीय वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचे कौतुक केले आहे. भारताचा विकास दर जगात सर्वात वेगवान असल्याचा दावा सर्व संस्था आणि रेटिंग एजन्सी यांनी केला आहे. केवळ चालू आर्थिक वर्षातच नाही तर पुढील आर्थिक वर्षातही भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढेल. यासोबतच ADB ने ही विकास दराचा अंदाज दिला आहे. आशियाई विकास बँकेने (ADB) चालू आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा अंदाज 7 टक्के इतका वर्तविला आहे.

सामान्य मान्सूनच्या अंदाजापेक्षा चांगला पाऊस पाहता भारताच्या कृषी क्षेत्रात सुधारणा अपेक्षित आहे. जेव्हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने भारताचा GDP वाढीचा अंदाज 7 टक्के केला अशावेळीच ADB चा अंदाज आल्याने त्याला फार महत्व आहे. IMF ने भारताच्या वाढीचा अंदाज 0.2 टक्क्यांनी वाढवला आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेनेही विकासदराच्या अंदाजात बदल केला होता.

आरबीआयने चालू आर्थिक वर्षाचा विकासदर 7 टक्क्यांवरून 7.2 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. याचा अर्थ RBI आणि IMF या दोघांनीही त्यांच्या वाढीचा अंदाज 0.2 टक्क्यांनी वाढवला आहे. एशियन डेव्हलपमेंट आउटलुक (ADO) च्या जुलैच्या अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्था 2024-25 (31 मार्च 2025 रोजी समाप्त) या आर्थिक वर्षात 7 टक्के दराने वाढेल. एप्रिल 2024 मध्ये ADO च्या अंदाजानुसार आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 7.2 टक्के दराने वाढ होण्याची अपेक्षा आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेने 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 8.2 टक्के वाढ नोंदवली, जी मागील आर्थिक वर्ष 2022-23 मधील 7 टक्के होती. या अहवालात असे म्हटले आहे की, सामान्य मान्सूनच्या अंदाजानुसार आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये मंद वाढ झाली. यामुळे कृषी क्षेत्रामध्ये सुधारणा अपेक्षित आहे. जूनमध्ये मान्सूनची प्रगती मंदावली असली तरी ही स्थिती समाधानकारक आहे. ग्रामीण भागातील विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी कृषी क्षेत्रातील सुधारणा महत्त्वाची ठरणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.