AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganeshotsav 2020 | कोकणातील जनतेच्या असंतोषाची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल : प्रवीण दरेकर

विनायक राऊत यांनी केलेले वक्त्यव्य अत्यंत दुटप्पीपणाचे आहे, असे प्रवीण दरेकर (Pravin Darekar On Konkan Ganeshotsav 2020) म्हणाले.

Ganeshotsav 2020 | कोकणातील जनतेच्या असंतोषाची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल : प्रवीण दरेकर
| Updated on: Jul 31, 2020 | 4:00 PM
Share

मुंबई : मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांनी अत्यावश्यक असेल तरच गणेशोत्सवासाठी कोकणात यावं, असे वक्तव्य शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केले होते. या वक्तव्यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केली. “विनायक राऊतांचे वक्तव्य अत्यंत दुटप्पीपणाचे आहे. त्यामुळे कोकणच्या जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्याची किंमत आता शिवसेनेला मोजावी लागेल,” असे प्रवीण दरेकर म्हणाले. (Pravin Darekar On Konkan Ganeshotsav 2020)

“कोकणची जनता असेल किंवा मुंबईतला चाकरमानी असेल, कोणतीही तकलादू भूमिका घेणार नाही. मुंबईतील चाकरमानी सुरक्षितपणे आपल्या गावी गेला पाहिजे. तो गावी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याची तपासणी असेल. त्यांना क्वारांटाईन करावे लागेल. पण त्याचा चाकरमान्यांना त्रास होणार नाही,” अशी दुहेरी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“विनायक राऊत यांनी केलेले वक्त्यव्य अत्यंत दुटप्पीपणाचे आहे. एका बाजूला भावना आणि दुसऱ्या बाजूला वस्तुस्थिती आहे. या कोकणच्या जनतेच्या भावनेवर शिवसेना स्वार झाली. ज्या चाकरमान्यांनी शिवसेना वाढविली, त्याच चाकरमान्यांच्या भावनेला ते आता पायदळी तुडवत आहेत,” असेही प्रवीण दरेकर म्हणाले.

“या वस्तुस्थितीची जाणीव विनायक राऊत करुन देत आहेत, हे फार दुर्दैवी आहे. या सर्वामुळे कोकणच्या जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून त्याची किंमत आता शिवसेनेला मोजावी लागेल,” असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

विनायक राऊत नेमकं काय म्हणाले?

“कोकणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक असेल तरच गणेशोत्वासाठी कोकणात या,” असे आवाहन विनायक राऊत यांनी केलं आहे.

:”कोरोनाच्या परिस्थितीमुळे चाकरमान्यांसाठी एसटी सुरु करण्यास उशीर होत आहे. कोकणात येणाऱ्यांना 14 दिवसाचा क्वारंटाईन पाळावाच लागणार आहे. तसेच चाकरमान्यांबद्दल भावनेच्या भरात निर्णय घेणे योग्य ठरणार नाही,” असेही राऊत म्हणाले. (Pravin Darekar On Konkan Ganeshotsav 2020)

संबंधित बातम्या : 

सुरक्षा रक्षकांसह माथाडी कामगारांना 50 लाखांचे विमा संरक्षण, अत्यावश्यक सेवेत समावेश, अजित पवारांची घोषणा

Gold Rate | अवघ्या 24 तासात सोने दरात मोठी वाढ, प्रतितोळ्याचा दर…

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.