AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिनके इरादे बुलंद होते है, वही चट्टानों को गिराते है, काय म्हणाले एकनाथ शिंदे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचा मेळावा बीकेसी मैदानावर आयोजित केला होता. सत्तेची अडीच वर्षे आपण जी कामे केली त्यामुळे हा महाविजय मिळाल्याचे शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेळाव्यात सांगितले.

जिनके इरादे बुलंद होते है, वही चट्टानों को गिराते है, काय म्हणाले एकनाथ शिंदे
| Updated on: Jan 23, 2025 | 9:46 PM
Share

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बीकेसीच्या मैदानावर शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केले आहे. ते म्हणाले मला मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षे मिळाली. त्याचा आपण पुरेपूर जनतेसाठी काम करण्यात घालविली.आपण पायला भिंगरी लावून काम करीत राहीलो. आम्ही अडीच वर्षे काम केली त्याचे फळ म्हणजे आम्हाला विधानसभेत मिळालेला महाविजय आहे असे यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून आपल्याला संधी मिळाली त्याचं आपण लाभ उठवित दुप्पट चौप्पट काम आम्ही केली आहे. माझ्या सोबत तुम्ही देखील काम केले आहे. आपण पायला भिंगरी लावून रात्रीचा दिवस करुन काम केले आहे. त्यामुळे आपल्याला हा महाविजय मिळाला आहे. हा लँड स्लाईड मँडेड विजय मिळविला आहे. आतापर्यंत इतिहासात इतका महाविजय मिळाला नाही असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

आपल्याला मिळालेल्या महाविजयामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. आपल्याला चौपट वेगाने काम करावं लागणार आहे. त्यासाठी अहोरात्र काम करायला मी तयार आहे. हा भगवा डौलाने फडकवत ठेवेल हा शब्द देतो असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. आपण बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा करणार नाही हे सांगतो. या शरीरातील रक्ताच्या प्रत्येक थेंबावर मायबाप जनतेचा हक्क आहे. तोच हक्क कायम राहील. हे वचन देतो असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

दोन कोटी ४० लाख बहिणींचा सख्खा भाऊ

मी साधा कार्यकर्ता आहे. कालही होतो, आजही आहे आणि उद्याही मी कार्यकर्ता म्हणून काम करतो. खुर्चीसाठी एकनाथ शिंदे कधीच कासावीस झाला नाही आणि होणार नाही. आई भवानीच्या आशीर्वादाने सर्व काही मिळालं आहे. मला मुख्यमंत्रीपद मिळाले. जनतेची सेवा करता आली. जनतेच्या आयुष्यात बदल घडवता आला. त्यांचं जीवन सुखी करण्याची संधी मला मिळाली. राज्यातील बहिणींचा दोन कोटी ४० लाख बहिणींचा सख्खा भाऊ,लाडका भाऊ म्हणून अशी आपल्याला ओळख मिळाली. ही पदापेक्षा मोठी आहे. खुर्चीची लालसा कुणाला आहे? आपल्याला कधीच नव्हती असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

जिनके इरादे बुलंद होते है, वही चट्टानों को गिराते है और जो तुफानों में पलते है, वही दुनिया बदलते है…

आम्ही उठाव केला. कारण कोणत्याही म्हणून कोणत्याही खुर्चीपेक्षा आपल्याला स्वाभिमान महत्त्वाचा आहे. बाळासाहेबांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला आहे. अडीच वर्षात मी किती वर्षाचे काम केले त्याचे मोजमाप तुम्ही करा असे आवाहन यावेळी एकनाथ शिंदे यांनी केले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.