AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Monsoon | महाराष्ट्रात मान्सूनसाठी अनुकूल स्थिती, पुढील चार दिवस मुसळधार : हवामान विभाग

येत्या काही तासात गोवा, कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Monsoon Hit Maharashtra Today)

Maharashtra Monsoon | महाराष्ट्रात मान्सूनसाठी अनुकूल स्थिती, पुढील चार दिवस मुसळधार : हवामान विभाग
| Updated on: Jun 11, 2020 | 11:15 AM
Share

पुणे : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनसाठी लागणारे पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे येत्या काही तासात गोवा, कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Monsoon Hit Maharashtra Today)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार दिवस म्हणजे 11 ते 14 जून या चार दिवसात राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. गोवा, कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून दाखल होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आज दुपारनंतर मान्सून कोकण किनारपट्टीवर दाखल होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यापूर्वी मुंबईत काही ठिकाणी पावसाची रिपरिप पाहायला मिळाली. मुंबईतील दादर, मांटुंगा, कुलाबा, मालाड, कांदिवली या ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

मुंबईसह नांदेड, हिंगोली या ठिकाणीही दमदार पाऊस झाला. नांदेडमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअस इतका पाहायला मिळत होता. मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे तापमान 35 अंशावर घसरले. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

तर दुसरीकडे हिंगोली परिसरात रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे पर्यायी पुलाचा काही भाग वाहून गेला. वसमत तालुक्यातील कुरुंदा गावाजवळील जलेश्वर नदीवरील पर्यायी पूलाचा काही भाग वाहून गेला आहे. त्यामुळे कुरुंदा गावाकडून टोकाई गडाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला (Monsoon Hit Maharashtra Today) आहे.

संबंधित बातम्या :

हवामान विभागाने मान्सूनचं वेळापत्रकच बदललं, पावसाळ्याचा हंगाम पुढे सरकत असल्याने निर्णय

गुड न्यूज! पुढील 24 तासात राज्यात मान्सून दाखल होणार

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.