AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एपीएमसी भाजीपला बाजारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

देशात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा (APMC market rush navi mumbai) केली.

एपीएमसी भाजीपला बाजारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
| Edited By: | Updated on: Mar 27, 2020 | 12:36 PM
Share

नवी मुंबई : देशात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा (APMC market rush navi mumbai) केली. लॉक डाऊनची घोषणा केल्यानंतर अनेक मोठ्या बाजारपेठाही बंद करण्यात आल्या होत्या. पण नागरिकांची गरज पाहता कोकण आयुक्त शिबाजीराव दौड यांच्या मध्यस्थीत नवी मुंबईतील एपीएमसी बाजार सुरू करण्यात आला. परंतु बाजार आवारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या गर्दीमुळे व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही गर्दी रोखण्यासाठी एपीएमसी प्रशासनाला अपयश आले असल्याचे दिसून येत आहे.

काही दिवसांच्या बंदनंतर बाजार आवारात आज 450 भाजीपाला गाड्याची आवक झाली. काल रात्री 12 वाजल्यापासून बाजारात व्यापारी, किरकोळ खरेदीदार यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. बाजारातील अनावश्यक गर्दी टाळण्याचे समितीने वारंवार आवाहन करूनही नागरिक दक्षता घेत नसल्याचे चित्र दिसत होते.

कोरोनाच्या पार्शवभूमीवर मार्केटच्या गेटवर जाहीर सूचनेचा फलक लावण्यात आला आहे. या जाहीर सुचनेत व्यापारी, अडते, दलाल, खरेदीदार ,वाहतूकदार, माथाडी कामगार आणि इतर सर्व घटकांनी आवक गेटवर उपलब्ध असलेले थर्मलचेक अप करून, सॅनिटायझर लाऊन आणि मास्क तोंडाला बांधून प्रवेश करावा. सदर सुचनेचे उल्लंघन केल्यास 1000 एवढा दंड आकारण्यात येईल आणि संबंधीबतवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं ठळकपणे सूचनेत नमूद करण्यात आलं आहे.

मार्केटच्या आत येणाऱ्या गाड्यांवर सोडियम हायड्रोक्लोर्यीडची फवारणी केली जात होती. मात्र रात्री 2 मध्ये सुरू होणाऱ्या या भाजीपला मार्केटच्या गेट बाहेर होणारी गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. या गर्दीवर नियंत्रण करण्याची गरज आहे नाहीतर बाजार आवारात एकाला कोरोना लागण झाली तर मोठ्या प्रमाणात पसरू शकते असे काही व्यापाऱ्यांनी सांगितले.

नागरिकांना भाजीपाला आणि अन्न धान्याचा योग्य पुरवठा करण्यासाठी  बाजार समितीमधील बाजार सुरु करणे गरजेचे होते. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाकडून गेली कित्येक दिवस व्यापारी, बाजार समिती घटक, कामगार प्रतिनिधी, पोलीस प्रशासन आणि रेशनींग अधिकारी यांची बैठक घेण्याचे काम सुरु होते. या दरम्यान कोकण आयुक्त शिवाजीराव दौड यांच्या अध्यक्षेतेखाली एक महत्वाची बैठक घेण्यात आली या बैठकीला सर्व घटकांच्या उपस्थितीनंतर मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, नवी मुंबईत कोरोनाचे 7 रुग्ण आढळून आले आहेत त्यासाठी महानगरपालिका आणि इतर प्रशासन जोरात कामाला लागले आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.