AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लडाखमध्ये मायनस 40 डिग्रीतही चीनला आव्हान देणार, थंडीसाठी भारतीय सैन्याची चोख व्यवस्था

थंडीच्या हंगामासाठी भारतीय सैन्याने आपल्या सैनिकांसाठी सीमालगत भागात अद्ययावत निवासी स्मार्ट कॅम्प बांधले आहेत.

लडाखमध्ये मायनस 40 डिग्रीतही चीनला आव्हान देणार, थंडीसाठी भारतीय सैन्याची चोख व्यवस्था
| Updated on: Nov 18, 2020 | 11:03 PM
Share

लेह : लडाखमध्ये भारताचे चीनसोबत तणावपूर्ण संबंध कायम आहेत. त्याचपार्श्वभूमीवर या थंडीच्या हंगामासाठी भारतीय सैन्याने आपल्या सैनिकांसाठी सीमालगत भागात अद्ययावत निवासी स्मार्ट कॅम्प बांधले आहेत. यामुळे आता भारतीय सैनिक मायनस 40 डिग्री तापमानात देखील चीनला सडेतोड उत्तर देण्यास सक्षम असणार आहेत. या कॅम्पमुळे भारतीय सैन्याचं कडाक्याच्या थंडीत संरक्षण होऊन चीनचा जशासतसे प्रत्युत्तर देण्याची चोख व्यवस्था तयार झाली आहे (Smart camps set up for soldiers in Ladakh army ready to face cold and China).

भारतीय सैन्य तैनात असलेल्या लडाखच्या काही भागात थंडीच्या दिवसांमध्ये तापमान शून्यापासून -40 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी होते. याशिवाय उंचीवरील ठिकाणी थंडीच्या काळात जवळपास 30 ते 40 फूट बर्फ जमा होण्याचा धोका असतो.

सैन्यातील काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा एक प्रकारचा स्मार्ट कॅम्प आहे. यात वीज, पाणी आणि हिटिंगसारख्या थंडीपासून वाचण्यासाठीच्या मुलभूत सुविधा उपलब्ध आहेत. या स्मार्ट कॅम्पला आरोग्य आणि स्वच्छता या दोन्ही दृष्टीने अत्याधुनिक बनवण्यात आलं आहे. या कॅम्पमुळे आता फ्रंटलाईनवर असलेल्या सैनिकांना आता कशाचीही कमतरता राहणार नाही आणि ते कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास सज्ज आहेत.

लडाखमधील स्मार्ट कॅम्पची वैशिष्ट्ये काय?

  • हे स्मार्ट कॅम्प तात्काळ कोणत्याही ठिकाणी लावता येणार
  • अनेक वर्षांच्या संशोधनानंतर या कॅम्पची निर्मितीत
  • कम्पमध्ये वीज, गरम पाणी, हिटिंगसारख्या अनेक सुविधा उपलब्ध
  • गरजेनुसार या कॅम्पचा उपयोग होणार
  • हे स्मार्ट कॅम्प -50 डिग्री तापमानातही जवानांचं थंडीपासून संरक्षण करणार

संबंधित बातम्या :

आमच्या अंतर्गत गोष्टींमध्ये नाक खुपसू नका, भारतानं चीनला ठणकावलं

‘लेह चीनचा भाग नाही, तर भारताच्या लडाखची राजधानी’, चुकीच्या GEO टॅगवरुन भारतानं ट्विटरला सुनावलं

गुपकार घोषणा: “आम्ही भाजपविरोधी आहोत, देशविरोधी नाही”, पीपल्स अलायन्सच्या बैठकीत फारुक अब्दुल्ला गरजले

Smart camps set up for soldiers in Ladakh army ready to face cold and China

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.