AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीज, पाणी, घर नाही, सहा महिने उलटूनही तिवरे धरणग्रस्तांचे कायमस्वरुपी पुनर्वसन नाही

काही महिन्यांपूर्वीच चिपळून येथे तिवरे धरण फुटलं होते. त्यामुळे संपूर्ण गावा पाण्याखाली गेले होते. काही क्षणात अनेकांच्या संसाराची राख (Tivre Dam rehabilitation)  रांगोळी झाली.

वीज, पाणी, घर नाही, सहा महिने उलटूनही तिवरे धरणग्रस्तांचे कायमस्वरुपी पुनर्वसन नाही
| Edited By: | Updated on: Jan 13, 2020 | 3:58 PM
Share

रत्नागिरी : काही महिन्यांपूर्वीच चिपळून येथे तिवरे धरण फुटलं होते. त्यामुळे संपूर्ण गावा पाण्याखाली गेले होते. काही क्षणात अनेकांच्या संसाराची राख (Tivre Dam rehabilitation)  रांगोळी झाली. यामध्ये अनेकांची घरं वाहून गेली होती. त्यासोबतच अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले होते. या घटनेला आज सहा महिने उलटूनही अद्याप सरकारकडून प्रकल्पग्रस्तांना हक्काचे घर मिळालेलं (Tivre Dam rehabilitation) नाही.

तिवरे धरणात ज्यांची घरं वाहून गेली आहेत त्यांना सरकारने तात्पुरते राहण्यासाठी कंटेनरची व्यवस्था करुन दिली आहे. पण या कंटेनरमध्येही वीज, पाण्यीची पुरेशी सोय नाही. त्याोसबतच ते मदतीसाठी आपलं धान्यही पुरवून खात आहेत.

या घटनेत एक 70 वर्षीय आजीनेही आपल्या व्यथा मांडल्या आहेत. या घटनेपूर्वीच आजीची मुलं देवाघरी गेली होती. सध्या त्या एकट्या राहत आहेत. आजींचेही पुनर्वसन झाले. पण व्यवस्थित चालता न येणाऱ्या आजीला अगदी टोकाला कंटेनर दिला आहे. ज्यामुळे त्यांना येजा करण्यास त्रास होत आहे. त्याोसबतच कंटेनरमध्ये दिलेला टेकू सुद्ध अगदी तकलादू आहे. त्यामुळे इथे राहण्यासाठी भीती वाटते, अशी खंत आजींनी व्यक्त केली.

राधिका आजीप्रमाणे या गावातील हिराबाई कनावजे यांचीही परिस्थिती वाईट आहे. कुटुंबात दहा लोकं पण राहायला एकच कंटेनर दिला आहे. तिवरे धरणात कनावजे यांचे घर सुद्धा वाहून गेले होते. तिवरे धरण फुटीत रेशन कार्डही वाहून गेले. त्यामुळे रेशन दुकानावर मिळणारे धान्य बंद झाले. आता जगायचे कसे असा प्रश्न हिराबाईसमोर उभा आहे.

“तिवरे धरण फुटीनंतर आज पाच कुटुंबीय कंटेनरमध्ये राहत आहेत. पुर्नवसन फक्त नावापुरतेच आहे”, असा आरोप इथल्या स्थानिकांनी केला आहे.

तिवरे धरणग्रस्तांच्या व्यथा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी समाजून घेतल्या असून लवकरच यावर सर्व प्राथमिक सुविधा तात्काळ पुरवण्याचे आश्वासन त्यांनी दिलं.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.