AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांना महायुतीत घेणार ? फडणवीस आणि बावनकुळे यांनी काय सांगितलं ?

याच निवडणुकीच्या मुद्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलं. उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये सध्या विस्तव जात नाही. त्याच मुद्यावरून फडणवीस यांनी हे भाष्य केले. उद्धव ठाकरे आले तर सोबत घेणार का असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा फडणवीस यांनी

उद्धव ठाकरे यांना महायुतीत घेणार ? फडणवीस आणि बावनकुळे यांनी काय सांगितलं ?
| Updated on: Feb 16, 2024 | 1:18 PM
Share

मुंबई | 16 फेब्रुवारी 2024 : निवडणुकांचे पडघम आता वाजू लागले असून लोकसभा निवडमूक काही महिन्यांवर आली आहे. त्यासोबत विधानसभा निवडणूकही घेतली तर राज्यातील मतदारांचा कल काय असेल याबाबत एक सर्व्हे घेण्यात येत आहे. तो पूर्ण झाल्यावर पुढील निर्णय घेण्यात येईल. या निवडणुकीत महायुती वि. महाविकास आघाडी असे युद्ध असेल . दरम्यान याच निवडणुकीच्या मुद्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलं. उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये सध्या विस्तव जात नाही. त्याच मुद्यावरून फडणवीस यांनी हे भाष्य केले. उद्धव ठाकरे आले तर सोबत घेणार का असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात नकार दर्शवला,

काय म्हणाले फडणवीस ?

उद्धव ठाकरे आमच्या सोबत येऊ शकत नाही. त्यांनीच, त्यांच्या बोलण्याने सगळी दारं बंद केली आहेत. त्यांनी आमचं मन दुखावले आहे. ते खालच्या खावली आहेत… खालच्या स्तरावर जाऊन टीका करतात, पंतप्रधान मोदींनाही ते सोडत नाहीत. त्यामुळेच मनं दुखावली गेली आहेत, असे सांगत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंसोबतचा रस्ता बंद असल्याचे स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंसाठी आमचे दरवाजे बंद

दरम्यान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही फडणवीस यांच्या बोलण्याला दुजोरा दिला आहे. ‘देवेंद्रजी म्हणतात ते खरंच आहे. ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला, जे देवेंद्रजींबद्दल, हिंदुत्वाबद्दल बोलले. ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, स्टॅलिन सोबत त्यांनी युती केली अशा धोकेबाज लोकांसोबत कोण राहील ? गद्दार लोकांसोबत कोण राहील ? आमचे दरवाजे आता उद्धवजींसाठी बंद आहेत. त्यांनी देवेंद्रजींचं खूप मन दुखावले आहे हे मी जवळून बघितलं आहे.

देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी उद्धव ठाकरेंना नेहमी मान दिला. ते त्यांना मातोश्रीवर जाऊन भेटायचे. उद्धव ठाकरे जे बोलायचे ते देवेंद्रजी करायचे, त्यांचा कोणताही शब्द देवेंद्रजींनी खाली पडू दिला नाही. मात्र एवढं करूनही जेव्हा एखादी व्यक्ती धोका देते, तेव्हा दुःख होते तशाच वेदना देवेंद्रजींनाही झाल्या आहेत. त्यांचं एवढं मन दुखावलं गेलं आहे. उद्धव ठाकरेंनी केवळ पॉलिटिकल खंजीर खुपसला नाही तर देवेंद्रजींना वेदनाही दिल्या आहेत’ असे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी दरवाजे बंद असल्याचे स्पष्ट केले.

मोदीजी आणि देवेंद्रजींना टार्गेट करून आणि आमच्या पक्षासाठी कमरेखालची भाषा वापरली. सकाळी नऊ वाजताचा लाऊड स्पीकर लावून (संजय राऊत) शिवीगाळ करणे, सामनातून लिहिणे याला उद्धवजीचं खुले समर्थन असणे या सगळ्या कृती सहन करण्याच्या पलीकडल्या आहेत, असेही बावनकुळे म्हणाले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.