AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Almond Benefits | सोलून खावेत की पाण्यात भिजवून? जाणून घ्या बदाम खाण्याची योग्य पद्धत

आपल्याला लहानपणापासूनच नेहमी बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. असे म्हटले जाते की बदाम खाल्ल्याने बुद्धी तल्लख होते. पण या व्यतिरिक्तही बदामाचे असे बरेच फायदे आहेत.

Almond Benefits | सोलून खावेत की पाण्यात भिजवून? जाणून घ्या बदाम खाण्याची योग्य पद्धत
बदाम
| Updated on: Apr 09, 2021 | 12:45 PM
Share

मुंबई : आपल्याला लहानपणापासूनच नेहमी बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. असे म्हटले जाते की बदाम खाल्ल्याने बुद्धी तल्लख होते. पण या व्यतिरिक्तही बदामाचे असे बरेच फायदे आहेत. बदाम शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते, निरोगी चरबी आणि रक्तातील साखर पातळी योग्य ठेवते. बदामांमध्ये प्रथिने, फायबर, व्हिटामिन ई, कॅल्शियम, जस्त सारखे अनेक पौष्टिक घटक असतात, जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. पण, बदाम सोलून खावेत की न सोलता खायला हवेत, याबद्दल बरेच लोक संभ्रमात असतात (Almond Benefits and know the right way to eat almond for more benefit).

जाणून घ्या बदाम खाण्याचा योग्य मार्ग

बदाम सोलून खावेत की न सोलता खावेत यावर बऱ्याच लोकांचे दुमत असते. बरेच लोक फक्त घाईघाईत सालासकटच बदाम खातात. यामुळे त्यांना बदामाचा पूर्णपणे लाभही मिळत नाही. बदामाचे साल पचायला खूप जड आहे. बदामाच्या सालामध्ये टॅनिन नावाचा एन्झाइम असतो. यामुळे पोषक घटक शरीरात पूर्णपणे शोषले जात नाहीत. म्हणूनच बदाम नेहमी सोलूनच खाल्ले पाहिजेत.

भिजवलेल्या बदामांचे फायदे

बदाम सालासकट खाणे तसेही थोडे त्रासदायक असते. त्याच वेळी, बदाम भिजवून ठेवल्याने मऊ होतात. रात्री कोमट पाण्यात बदाम भिजवल्याने फायटिक आम्लाचे प्रमाण कमी होते. फायटिक आम्लाचे प्रमाण जास्त झाल्यास कॅल्शियम, झिंक आणि मॅंगनीजची कमतरता भासू शकते. म्हणूनच, भिजलेल्या बदामांचे सेवन करावे. भिजवलेल्या बदामांमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते. जे टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांसाठी देखील खूप उपयुक्त आहे. योग्य प्रमाणात मॅग्नेशियम सेवन केल्यास शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी होते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका देखील कमी होतो (Almond Benefits and know the right way to eat almond for more benefit).

एका दिवसात किती बदाम खावेत?

  1. रात्री 3 ते 4 बदाम भिजवा. सकाळी ही बदाम सोलून तुम्ही खाऊ शकता. हे बदाम आपल्याला त्वरित ऊर्जा देतील, जी सकाळी अधिक महत्वाची आहे.
  2. सकाळचा नाश्ता पौष्टिक करण्यासाठी आपण ओट्स, स्मूदी आणि शेकमध्ये बदाम वापरू शकता.
  3. न्याहरीसाठी आपण बदाम मनुका, अक्रोड आणि भोपळ्याच्या बिया भिजवून खाऊ शकता.
  4. बर्फी, लाडू, कुकीज, ग्रॅनोला बार आणि क्लासिक हलवा यासारख्या घरी बनवलेल्या मिठाईंमध्येही बदामांचा वापर केला जाऊ शकतो.
  5. एका दिवसात 6 ते 8 बदामांपेक्षा जास्त बदाम सेवन करू नयेत, यामुळे वजन वाढू शकते आणि शरीराची उष्णता देखील वाढू शकते.
  6. आपण दररोज 3 ते 4 बदामाचे सहज सेवन करू शकता.

(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Almond Benefits and know the right way to eat almond for more benefit)

हेही वाचा :

Ayurveda fruits Rules : फळांचे सेवन करताय? मग, आधी आयुर्वेदाने सांगितलेले ‘हे’ नियम जाणून घ्या!

Home Remedies | ‘डार्क अंडर आर्म्स’च्या समस्येतून मुक्ती हवीय? मग, ‘या’ सोप्या घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.