AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : ‘या’ 4 गोष्टी स्मरणशक्तीला मारक, त्यांचा तुमच्या आहारात समावेश नाही ना?, वाचा याबद्दल सविस्तर!

स्मरणशक्तीचा संबंध वयाशी आहे असे मानले जाते. असं म्हणतात की वय वाढलं की स्मरणशक्ती कमी होऊ लागते. पण तुम्ही तुमच्या आजूबाजूला काही वयोवृद्ध माणसेही पाहिली असतील. ज्यांच्या स्मरणशक्तीवर वयाचा कोणताही परिणाम झालेला नाही आणि वृद्धापकाळातही त्यांची स्मरणशक्ती चांगली राहिली आहे.

Health Care : 'या' 4 गोष्टी स्मरणशक्तीला मारक, त्यांचा तुमच्या आहारात समावेश नाही ना?, वाचा याबद्दल सविस्तर!
आहार
Follow us
| Updated on: Nov 06, 2021 | 7:32 AM

मुंबई : स्मरणशक्तीचा संबंध वयाशी आहे असे मानले जाते. असं म्हणतात की वय वाढलं की स्मरणशक्ती कमी होऊ लागते. पण तुम्ही तुमच्या आजूबाजूला काही वयोवृद्ध माणसेही पाहिली असतील. ज्यांच्या स्मरणशक्तीवर वयाचा कोणताही परिणाम झालेला नाही आणि वृद्धापकाळातही त्यांची स्मरणशक्ती चांगली राहिली आहे. वास्तविक हे सर्व त्यांच्या चांगल्या आहार आणि दिनचर्येचा परिणाम आहे.

सर्व संशोधनातून असे दिसून आले आहे की अन्नाचा केवळ आपल्या शारीरिक आरोग्यावरच नाही तर आपल्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. जर तुमचा आहार योग्य नसेल तर शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही समस्या तुम्हाला वेळेपूर्वी घेरतात. आजकाल बहुतेक लोकांना लहान वयातच मधुमेह, संधिवात, बीपी, तणाव इत्यादी समस्या होतात. याचे एक कारण त्यांचा चुकीचा आहार हे देखील आहे. येथे जाणून घ्या अशा 5 गोष्टींबद्दल ज्या शरीरासोबतच मानसिक आरोग्यासाठीही अत्यंत वाईट मानल्या जातात. त्यांच्या सेवनामुळे राग, चिडचिडेपणा, तणाव वाढतो आणि स्मरणशक्ती कमजोर होऊ लागते.

तळलेले अन्न

जास्त तळलेले पदार्थ खाणे स्वादिष्ट वाटते. परंतु ते कोणत्याही प्रकारे आपल्या आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. जास्त तळलेले अन्न तुमच्या चेतापेशींचे नुकसान करते आणि मेंदूची क्षमता कमी करते. याचा थेट परिणाम तुमच्या स्मरणशक्तीवर होतो. त्यामुळे शक्यतो साधे आणि पचणारे अन्न खाण्याची सवय लावा.

जंक फूड

जंक फूडमध्ये चव वाढवण्यासाठी अशा काही गोष्टींचा वापर केला जातो. ज्यामुळे डोपामाइन हार्मोनच्या उत्पादनावर परिणाम होतो. ते जास्त खाल्ल्याने व्यक्तीमध्ये तणावाची पातळी वाढते आणि त्याची स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागते.

दारू

दारू पिण्याची सवय तुमचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त करू शकते. यामुळे तुमच्या शरीरात अनेक घातक रोग होतात. तसेच मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. ते प्यायल्याने व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडू लागते. स्मरणशक्ती कमकुवत होते आणि साध्या गोष्टीही विसरण्याची समस्या वाढते.

गोड

मिठाई खाण्याचे शौकीन असलेल्या लोकांनी देखील काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जास्त साखर खाल्ल्याने मेंदूवरही परिणाम होतो. यामुळे मन सुस्त होते आणि आपले काम नीट होत नाहीत. त्यामुळे व्यक्तीची स्मरणशक्ती कमी होऊ लागते.

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

(Avoid these 4 foods in the diet, memory is weak)

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.