AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Control | वजनही नियंत्रणासह चमकदार चेहऱ्यासाठी दररोज गरम पाणी पिणे आवश्यक! वाचा याचे फायदे…

शरीर निरोगी राहण्यासाठी पाण्याचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. आपण थंड पाणी किंवा गरम पाणी पीत असतो. परंतु, जर आपण नियमित गरम पाण्याचे सेवन केले, तर आपल्याला त्यातून बरेच फायदे मिळतील.

Weight Control | वजनही नियंत्रणासह चमकदार चेहऱ्यासाठी दररोज गरम पाणी पिणे आवश्यक! वाचा याचे फायदे...
पाणी
| Updated on: Mar 16, 2021 | 3:24 PM
Share

मुंबई : शरीर निरोगी राहण्यासाठी पाण्याचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. आपण थंड पाणी किंवा गरम पाणी पीत असतो. परंतु, जर आपण नियमित गरम पाण्याचे सेवन केले, तर आपल्याला त्यातून बरेच फायदे मिळतील. गरम पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे (Warm water can help you to Weight Control).

परंतु, लक्षात ठेवा आपण पीत असलेले पाणी गरम म्हणजेच अगदी उकळलेले असू नये, तर ते साधारण गरम म्हणजेच कोमट असावे. अशा पाण्याचे तुम्ही आरामदायक पद्धतीने सेवन करू शकता. आपल्या शरीराला गरम पाणी पिण्याचे काय फायदे आहेत, ते आपण जाणून घेऊया…

सर्दी व खोकल्यापासून मुक्त व्हाल.

सर्दी किंवा पडसे झाल्यास नाक बहुतेक वेळा बंद होते. तर अशा परिस्थितीत जर तुम्ही गरम पाण्याचे सेवन केले, तर लवकरच तुमच्या समस्या लगेच कमी होतील. सर्दीमुळे घश्यात खोकला आणि शिंक येण्याचा त्रास होत असला, तरी गरम पाण्याचे सेवन करणे चांगले मानले जाते.

पचन योग्य ठेवते.

जर, आपण दररोज गरम पाण्याचे सेवन केले, तर ते आपल्या पाचन तंत्रास खूप मजबूत करते. गरम पाण्याचे सेवन केल्यामुळे बद्धकोष्ठता, आम्लपित्त, आंबट ढेकर येणे आणि अपचन यासारख्या समस्यांपासून मुक्ती मिळते आणि त्याच वेळी अन्न पचन करण्यासाठी गरम पाणी खूप प्रभावी ठरते.

वजन कमी करण्यात उपयुक्त.

आपण आपल्या वाढत्या वजनाने त्रस्त असाल, तर आपण दररोज गरम पाण्याचे सेवन करू शकता. गरम पाण्याचे सेवन केल्याने तुमचे चयापचय बळकट होते, जे तुमचे वजन कमी करण्यास मदत करते. कोमट पाण्यात लिंबू मिसळून, ते पाणी प्यायल्याने आपले वजन देखील कमी होऊ शकते (Warm water can help you to Weight Control).

रक्त परिसंचरण योग्य ठेवते.

दररोज गरम पाण्याचे सेवन केल्याने तुमचे रक्त परिसंचरण सुरळीत होते, यामुळे संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण चांगले होते.

शरीर डीटॉक्स होते.

गरम पाण्याचे सेवन आपल्या शरीरास डिटॉक्स करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. हे पाणी सेवन केल्याने तुमच्या शरीरात उपस्थित सर्व प्रकारचे टॉक्सिक घटक बाहेर फेकले जातात आणि बॉडी डिटॉक्सही होते.

मासिक पाळी दरम्यानच्या वेदनांपासून आराम

अनेकदा महिलांना पीरियड्स दरम्यान खूप त्रास होतो. काहींना असह्य वेदना देखील होत असतात. म्हणून जर आपणही या समस्येशी संघर्ष करत असाल, तर त्यापासून मुक्त होण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे आपल्या पाळीच्या दरम्यान गरम पाण्याचे सेवन करणे. यामुळे आपल्याला वेदनांमध्ये बरेच आराम मिळेल.

त्वचेत घट्टपणा येतो.

जर आपल्याला आपल्या त्वचेत घट्टपणा आणि अधिक चमक आणायची असेल, तर आपण सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी सेवन केले पाहिजे. यामुळे, आपली चेहर्‍यावरील मुरुमांच्या समस्येपासूनही सुटका होईल.

(Warm water can help you to Weight Control)

हेही वाचा :

Lipstick shades | तुमच्या चेहऱ्यासाठी लिपस्टिकचा कोणता रंग ठरेल सर्वोत्तम? जाणून घ्या…  

आकर्षक वनस्पतींनी खुलवा घरांची सजावट, जाणून घ्या कशी करायची देखभाल?

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.