AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाव कारभाऱ्यांनो, जय-परायज विसरुन संधीचं सोनं करा; अजितदादांचं आवाहन

या निवडणुकीतील सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले. (Ajit Pawar appeal to all Maharashtra Gram Panchayat Winners)

गाव कारभाऱ्यांनो, जय-परायज विसरुन संधीचं सोनं करा; अजितदादांचं आवाहन
ajit pawar
| Updated on: Jan 18, 2021 | 5:46 PM
Share

मुंबई : “गाव कारभाऱ्यांनो, आता मिळालेल्या संधीचं सोनं करा, जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र या,” असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना केले आहे. राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आज (18 जानेवारी 2020) जाहीर झाले. या निवडणुकीतील सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले. तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. (Ajit Pawar appeal to all Maharashtra Gram Panchayat Election Results Winners)

“स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीचा पाया भक्कम करणारी आणि महात्मा गांधीजींचे ग्रामविकासाचे स्वप्न सत्यात आणणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेतील ग्रामपंचायत हा महत्वाचा घटक आहे. या ग्रामविकासाच्या प्रक्रियेत काम करण्याची संधी आता तुम्हाला मिळाली आहे. गावाचा विकास करण्यासाठी लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी आता आणखी वाढली आहे,” असेही अजित पवार म्हणाले.

“स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दाखविलेल्या विकासाच्या मार्गावर आपल्या गावाला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावं. जनतेचा विश्वास सार्थ ठरवत ग्रामविकासाचा आदर्श निर्माण करावा,” असे अजित पवार निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांना दिलेल्या संदेशात म्हटले.

महाविकासआघाडीच्या गटाला चांगला प्रतिसाद – अजित पवार

दरम्यान काही वेळापूर्वी अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अजित पवार म्हणाले, “काही दिवसांपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या. यात महाविकासआघाडीला चांगले यश मिळाले होते. त्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकासआघाडीच्या गटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे यांच्या गटाचा देखील पराभव झाला आहे. तर या ठिकाणी कर्जत जामखेड आमदार रोहित पवार यांच्या गटाचा विजय होताना दिसत आहे,” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. (Ajit Pawar appeal to all Maharashtra Gram Panchayat Election Results Winners)

संबंधित बातम्या : 

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाची धामधूम, अजित पवारांची प्रतिक्रिया

अहमदनगर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates: चौंडी गावात राम शिंदेना पुन्हा धक्का, आमदार रोहित पवारांची बाजी

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.