AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ravi Rana : अमरावतीतील बेपत्ता मुलीचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, रवी राणा यांचा पोलीस आयुक्तांवर नवा आरोप

बॉर्डरवर जवान शहीद होतात. त्यांना मी माझा पगार दिलेला आहे. शहिदांसाठी पोलिसांसाठी नेहमी रक्तदान आयोजन केलं. पोलिसांचा अपमान करणं आमच्या रक्तात नाही, असंही रवी राणा ठामपणे म्हणाले.

Ravi Rana : अमरावतीतील बेपत्ता मुलीचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, रवी राणा यांचा पोलीस आयुक्तांवर नवा आरोप
रवी राणा यांचा पोलीस आयुक्तांवर नवा आरोप
| Edited By: | Updated on: Sep 10, 2022 | 7:02 PM
Share

अमरावतीतील बेपत्ता मुलीचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. असा आरोप आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी पोलीस आयुक्त (Commissioner of Police) आरती सिंह यांच्यावर केलाय.अमरावती पोलिसांकडे (Amravati Police) पीडित कुटुंब खूप वेळा गेले. मात्र पोलिसांनी अॅक्शन घेतली नाही, असा निशाणा रवी राणा यांनी पोलिसांवर साधला.आरती सिंह यांनी जो आरोपी पकडला होता त्या आरोपीचा खुलासा का केला नाही? जेव्हा ती मुलगी गायब होती तेव्हा हे लोकं पुढे का आले नाही?, असा सवालही त्यांनी विचारला.

गुन्हे दाखल करण्याची सुपारी

रवी राणा म्हणाले, गेले अडीच वर्ष उद्धव ठाकरे सरकार होते. मी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं. त्या आंदोलनात मला दिवाळीच्या तीन दिवस आधी अटक केली. शाईफेक प्रकरणी माझ्यावर गुन्हे दाखल केले. नवनीत राणांवर गुन्हे दाखल केले. जेव्हा जेव्हा मी जनहिताचे प्रश्न मांडले तेव्हा आयुक्त आरती सिंह यांनी नेत्यांना खूश करण्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल करण्याची पूर्ण सुपारी आरती सिंह यांनी घेतली, असा घणाघातही त्यांनी केला.

पोलिसांचा नेहमी सन्मान केला

पोलिसांचा नेहमी आदर आणि सन्मान केला. शहीद पोलिसांच्या कुटुंबासाठी मी केंद्र सरकारकडून सुविधा मिळवून दिल्या. बॉर्डरवर जवान शहीद होतात. त्यांना मी माझा पगार दिलेला आहे. शहिदांसाठी पोलिसांसाठी नेहमी रक्तदान आयोजन केलं. पोलिसांचा अपमान करणं आमच्या रक्तात नाही, असंही रवी राणा ठामपणे म्हणाले.

अमरावतीत वसुली पथकं सुरू केलं

आरती सिंह यांनी वसुली पथक अमरावतीत सुरु केलं. आरती सिंह यांनी काही नेत्यांना खूश करण्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल केले. अमरावतीत जेव्हापासून आरती सिंह आल्या तेव्हापासून रोज तीन ते चार हत्या होतात. कोल्हे प्रकरण जेव्हा झालं, तेव्हा कोल्हे यांची केस आरती सिंह यांनी केस दाबण्याचा प्रयत्न केला. एनआयएच्या टीमने त्या प्रकरणाची चौकशी केली, याची आठवण रवी राणा यांनी करून दिली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.