AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारच्या वाईन धोरणाविरोधात अण्णा हजारेंचा एल्गार, आण्णांचा उपोषणाचा इशारा, सरकारची डोकेदुखी वाढणार?

अण्णांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती. त्याबाबत अण्णांनी राज्य सरकारला 3 फेब्रुवारी रोजी एक पत्र पाठवलं होतं. त्या पत्राला राज्य सरकारकडून उत्तर देण्यात आलं नाही. त्यामुळे अण्णांनी राज्य सरकारला एक स्मरणपत्र पाठवलं आहे. त्यात वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात बेमुदत उपोषण करण्यावर ठाम असल्याचं अण्णांनी म्हटलंय.

सरकारच्या वाईन धोरणाविरोधात अण्णा हजारेंचा एल्गार, आण्णांचा उपोषणाचा इशारा, सरकारची डोकेदुखी वाढणार?
अण्णा हजारे, उद्धव ठाकरे
| Edited By: | Updated on: Feb 05, 2022 | 11:22 PM
Share

अहमदनगर : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वाईन धोरणाविरोधात राज्यात विरोधी पक्षासह अनेक सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य माणसांकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. भाजपनं तर ठाकरे सरकार महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपच केला आहे. त्यानंतर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी ठाकरे सरकारच्या वाईन धोरणाविरोधात एल्गार पुकारलाय. किराणा दुकानं आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात अण्णा हजारे यांनी आता बेमुदत उपोषण (Indefinite fasting) करण्याचा इशारा दिला आहे. त्याबाबतचं एक पत्र अण्णांनी 3 फेब्रुवारीला राज्य सरकारला पाठवलं आहे. त्या पत्राचं उत्तर न मिळाल्यानं अण्णांनी एक स्मरणपत्र पाठवून उपोषणावर ठाम असल्याचं राज्य सरकारला कळवलं आहे.

राज्यात सर्वत्र एकाच वेळी आंदोलन?

अण्णांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती. त्याबाबत अण्णांनी राज्य सरकारला 3 फेब्रुवारी रोजी एक पत्र पाठवलं होतं. त्या पत्राला राज्य सरकारकडून उत्तर देण्यात आलं नाही. त्यामुळे अण्णांनी राज्य सरकारला एक स्मरणपत्र पाठवलं आहे. त्यात वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात बेमुदत उपोषण करण्यावर ठाम असल्याचं अण्णांनी म्हटलंय. इतकंच नाही तर राज्यातील बऱ्याच संस्था आणि संघटनांनी सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारच्या वाईन धोरणाविरोधात आता संपूर्ण राज्यात एकाच वेळी आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा अण्णांनी ठाकरे सरकारला दिलाय.

राज्य सरकारचा निर्णय काय?

राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. दहा वर्षांपूर्वीचा हा प्रस्ताव आहे. त्यामुळे आज निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालत असल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितलं होतं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 27 जानेवारी रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना त्याबाबतची माहिती दिली. महाराष्ट्रात बऱ्याच वायनरी आहेत. त्यामुळे आता सरकारने नवीन पॉलिसी ठरवली आहे. सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक हजार स्क्वेअर फुटापर्यंतच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला ठेवण्याची परवानगी देण्यात येणारआहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं होतं. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारच्या या प्रस्तावावर शिक्कामोर्तबही करण्यात आलं.

इतर बातम्या :

‘महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’, फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

‘महाराष्ट्रात लोकशाहीचा मुडदा पाडू नका’, किरीट सोमय्यांवरील हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.