AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भक्ती’ची कूस पुन्हा रिती, सिद्धार्थ उद्यानातील दुसऱ्याही बछड्याचा मृत्यू, दोन्ही पिल्लांसाठी वाघीणच ठरली काळ

भक्ती वाघीणीत मातृत्वाची भावना दिसून आली नसल्याने ती पिल्लांची व्यवस्थित काळजी घेत नव्हती, असं बोललं जातं (Aurangabad Zoo Tigress Cub Dies)

'भक्ती'ची कूस पुन्हा रिती, सिद्धार्थ उद्यानातील दुसऱ्याही बछड्याचा मृत्यू, दोन्ही पिल्लांसाठी वाघीणच ठरली काळ
औरंगाबादमधील भक्ती वाघीणीच्या दोन्ही बछड्यांचा मृत्यू
| Updated on: Apr 16, 2021 | 7:33 AM
Share

औरंगाबाद : भक्ती वाघिणीचाच पाय पडून तिच्या एका बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना दुसऱ्या बछड्यानेही जगाचा निरोप घेतला. आईची माया न मिळाल्याने दुसऱ्याही बछड्याचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. गेल्या आठवड्यात जन्मलेल्या दोन बछड्यांपैकी एकाचा अवघ्या चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयात ही घटना घडली. (Aurangabad Siddharth Zoo Bhakti Yellow Tigress second Cub Dies after first)

दुसऱ्या बछड्याचा कसा मृत्यू?

सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील पिवळ्या भक्ती वाघिणीने दोन पांढऱ्या बछड्यांना जन्म दिला होता. भक्ती वाघिणीने बछड्यांना जन्म देण्याची ही पहिलीच वेळ होती. मात्र तिच्यामध्ये मातृत्वाची भावना दिसून आली नसल्याने ती पिल्लांची व्यवस्थित काळजी घेत नव्हती. वाघीण स्वतः बछड्यांना दूध पाजत नव्हती. त्यामुळे पिल्लाला ठराविक अंतराने बकरीचे दूध पाजण्यात येत होते. आईची माया न मिळाल्याने दुसऱ्याही बछड्याने अखेरचा श्वास घेतल्याची माहिती आहे.

पहिल्या बछड्यासोबत काय झालं?

भक्ती वाघिणीचा पाय नकळत स्वतःच्या पिल्लावर पडल्याने पहिल्या बछड्याचा 10 एप्रिलला मृत्यू झाला होता. बछड्याच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. एकाच दिवशी जन्मलेल्या दोन्ही बछड्यांनी एकामागून एक जगाचा निरोप घेतला. या दुर्दैवी घटनेमुळे उद्यानातील कर्मचाऱ्यांसह प्राणीप्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

वीर वाघ आणि भक्ती वाघिणीचा बछडा

भक्ती वाघिणीने तीन एप्रिलला दोन पांढऱ्या रंगाच्या बछड्यांना जन्म दिला होता. पांढऱ्या रंगाचा वीर वाघ आणि पिवळ्या रंगाच्या भक्ती वाघिणींचे हे दोन बछडे. या दोन बछड्यांमुळे सिद्धार्थमधील पांढऱ्या वाघांची संख्या पाच झाली होती. एवढे पांढरे वाघ असणारे सिद्धार्थ उद्यान राज्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय मानले जात.

सव्वा तीन महिन्यांनी पुन्हा नवे पाहुणे

सिद्धार्थ उद्यानात समृद्धी वाघिणीने 25 डिसेंबर रोजी पाच वाघिणींना जन्म दिला होता. त्यानंतर सव्वा तीन महिन्यांनी पुन्हा नव्या पाहुण्यांच्या आगमनाने आनंदाचे वातावरण होते. मात्र अवघ्या काही दिवसांतच या आनंदावर विरजण पडले. (Aurangabad Siddharth Zoo Bhakti Yellow Tigress second Cub Dies after first)

सिद्धार्थमधील वाघांची संख्या पुन्हा 14 वर

आतापर्यंत 42 वाघांना जन्मस्थान असलेले सिद्धार्थ उद्यान हे व्याघ्रजननाचे नवे केंद्र ठरतेय. सिद्धार्थमधील एकूण वाघांची संख्या दोन नव्या बछड्यांच्या जन्माने 16 झाली होती, मात्र दुर्दैवाने ती घटून पुन्हा 14 वर आली आहे. त्यात वीर, अर्पितासह तीन पांढरे तर 11 पिवळ्या रंगाचे वाघ-वाघीण आहेत. या सर्व वाघांचे पालकत्व एसबीआय बँकेने घेतलेले आहे.

पहिल्या बछड्याच्या मृत्यूचे वृत्त :

संबंधित बातम्या :

औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानात नवे सवंगडी; समृद्धी वाघीणीने दिला पाच बछड्यांना जन्म

VIDEO | आईच काळ ठरली, वाघिणीचा पाय पडून औरंगाबादेत बछड्याचा करुण अंत

(Aurangabad Siddharth Zoo Bhakti Yellow Tigress second Cub Dies after first)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.