AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद नावासाठी हजारो नागरिकांचा कँडल मार्च, MIM खासदार इम्तियाज जलील म्हणाले….

औरंगाबादमधील नामांतर विरोधी कृती समितीने मागील सात दिवसांपासून बेमुदत आंदोलन सुरु केलंय. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून गुरुवारी भडकल गेटपर्यंत कँडल मार्च काढण्यात आला. या कँडल मार्चचं नेतृत्व महिलांनी केलं.

औरंगाबाद नावासाठी हजारो नागरिकांचा कँडल मार्च, MIM खासदार इम्तियाज जलील म्हणाले....
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 10, 2023 | 9:41 AM
Share

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादचं (Aurangabad) नामांतर छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) केल्याचा निषेध नोंदवण्यासाठी गुरुवारी सायंकाळी शहरात भव्य कँडल मार्च काढण्यात आला. नामांतर विरोधी संघटनांनी गेल्या सात दिवसांपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हेसुद्धा या आंदोलनात सहभागी आहेत. काल खा. जलील यांच्या नेतृत्वात शहरातून भव्य कँडल मार्च काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय ते भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत गुरुवारी रात्री हा कँडल मार्च काढण्यात आला. शहराचे नाव औरंगाबाद हे कायम ठेवावे, अशी मागणी या नागरिकांनी केली. या कँडलमार्चमध्ये हजारो महिला आणि पुरुषांनी सहभाग नोंदवला.

Candle

नामांतरविरोधी समितचे बेमुदत आंदोलन

महाराष्ट्र राज्य तसेच केंद्र सरकारनेही औरंगाबाद शहर तसेच जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजी नगर करण्यास मंजूरी दिली आहे. याविरोधात औरंगाबादमधील नामांतर विरोधी कृती समितीने मागील सात दिवसांपासून बेमुदत आंदोलन सुरु केलंय. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून गुरुवारी भडकल गेटपर्यंत कँडल मार्च काढण्यात आला. या कँडल मार्चचं नेतृत्व महिलांनी केलं.

खा. जलील यांचा इशारा काय?

औरंगाबाद हेच नाव राहून द्यावं, या मागणीसाठी हजारो नागरिक काल रस्त्यावर उतरलेले दिसले. भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला खासदार इम्तियाज जलील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर कँडलमार्चमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना खा. जलील यांनी संबोधित केलं. औरंगाबादचं नाव बदलण्याचा निर्णय याच शहरातील तसेच संपूर्ण जिल्ह्यातील जनतेने घेतला पाहिजे. आमच्या शहराचं नाव बदलण्याचा निर्णय मुंबई आणि दिल्लीतून आलाय. हे आदेश आम्हाला मान्य नाहीत. आमच्या शहराचं नाव पुन्हा औरंगाबाद होईपर्यंत आमचा हा रस्त्यावरील आणि कायदेशीर लढा सुरु राहील, असा इशारा खा. जलील यांनी दिला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.