AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“जातीयवादी संघटनेचं आंदोलन हे एक नाटक”; ठाकरे गटानं नामांतराच्या आंदोलनावर आसूड ओढले

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असं नामाकरण करण्यात आल्यानंतर आता हा वाद आणखी चिघळला आहे. त्यामुळे राज्यातील वाद चिघळला आहे. त्यामुळेच आता या आंदोलनावर जातीयवादाचा ठपका ठेवण्यात आला आहे.

जातीयवादी संघटनेचं आंदोलन हे एक नाटक; ठाकरे गटानं नामांतराच्या आंदोलनावर आसूड ओढले
| Updated on: Mar 08, 2023 | 11:53 PM
Share

औरंगाबादः एमआयएमचे नामांतराविरोधात आंदोलन सुरु आहे त्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हे आंदोलन म्हणजे नाटक असल्याटी टीका केली आहे. औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्यात आले. त्यानंतर एमआयएमने औरंगजेबाचे उदात्तीकरण करत नामांतराविरोधात आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांनी त्यांच्याविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे.

औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आल्यानंतर एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून आंदोलन पुकारण्यात आले.

यावेळी या आंदोलनामध्ये औरंगजेबाचे फोटोही झळकवण्यात आले. त्यामुळे या जातीयवादी संघटनेवर आणि आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही अंबादास दानवे यांनी केली आहे.

छत्रपती संभाजीनगर असं नामांतर करण्यात आल्यानंतर या शहरातील जातीयवादी संघटनेने आंदोलन पुकारलेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

अंबादास दानवे यांनी या पक्षावरच कारवाई करण्याची मागणी केली आहे. एमआयएमकडून दिवसा तिथे उपोषण केले जाते आणि रात्रीच्यावेळी मात्र तिथे बिर्याणी खाल्ली जाते असा आरोपही जलील यांच्यावर करण्यात आला आहे. रात्रीच्या दहा वाजल्यानंतर लाऊडस्पीकरवर बंदी असतानाही त्या ठिकाणी लाऊडस्पीकर लावले गेले आहेत.

त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.या आंदोलनाच्या निमित्ताने औरंगजेबाचे उदात्तीकरण केले जात असल्याची टीकाही त्यांनी एमआयएमवर केली आहे.

तसेच याच आंदोलनात औरंगजेब हा बाप होता अशी वक्तव्यही वारंवार केली गेली आहेत. त्यामुळे अशा प्रकारची आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही एमआयएमवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  हे आंदोलन एक प्रकारचे नाटक असून यानिमित्ताने या जातीयवादी पक्षाकडून औरंगजेबाचे उदात्तीकरण केले असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.