AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअर इंडिया कर्मचाऱ्यास मारहाण, उस्मानाबादचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांना दिलासा, देशभरात गाजलेले प्रकरण!

उस्मानाबादचे शिवसेनेचे (Shiv Sena) माजी खासदार रवींद्र गायकवाड (Ravindra Gaikwad) यांची एअर इंडिया कर्मचाऱ्यास मारहाण केल्याच्या प्रकरणात 2 कलमातून दिल्ली कोर्टाने सुटका केली आहे. गायकवाड यांच्यावर आता कलम 355 नुसार खटला चालवला जाणार आहे.

एअर इंडिया कर्मचाऱ्यास मारहाण, उस्मानाबादचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांना दिलासा, देशभरात गाजलेले प्रकरण!
| Edited By: | Updated on: Feb 22, 2022 | 11:28 AM
Share

उस्मानाबादः  उस्मानाबादचे शिवसेनेचे (Shiv Sena) माजी खासदार रवींद्र गायकवाड (Ravindra Gaikwad) यांची एअर इंडिया कर्मचाऱ्यास मारहाण केल्याच्या प्रकरणात 2 कलमातून दिल्ली कोर्टाने सुटका केली आहे. गायकवाड यांच्यावर आता कलम 355 नुसार खटला चालवला जाणार आहे. 2 कलमातून मुक्ताता केल्याने गायकवाड यांना दिलासा मिळाला आहे. एअर इंडिया (AIR India) कर्मचाऱ्यास मारहाण प्रकरण नंतर उस्मानाबादचे रवींद्र गायकवाड देशभर चर्चेत आले होते. त्यानंतर गायकवाड यांच्यावर विमान प्रवास बंदी व प्रसार माध्यमांचा पाठलाग सोडविण्यासाठी गायकवाड यांनी केलेले वेशांतर चांगलेच गाजले होते. या प्रकरणी दोन आरोपांतून दिल्ली सत्र न्यायालयाने त्यांची सुटका केली आहे. तर एका आरोपप्रकरणी अद्याप सुनावणी झालेली नाही.

काय घडलं होतं तेव्हा?

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी मारहाण केली नंतर एअर इंडियाचे कर्मचारी आणि रवींद्र गायकवाड यांच्यामधल्या वादाचा व्हि़डिओ व्हायरल झाला होता. बिझनेस क्लासचं तिकीट असूनही मला इकोनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आले. याचा जाब मी त्या कर्मचाऱ्याला विचारला असता, त्याने मला दाद दिली नाही. मला अपशब्द वापरले आणि त्यानंतर आपण मारहाण केल्याचे गायकवाड यांनी त्यावेळी सांगितले होते. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे अन्याय सहन करणारा नाही, गप्प बसायला मी भाजप खासदार नाही असे त्यांचे वक्तव्य त्यावेळी चांगलेच गाजले होते, या प्रकरणा नंतर ते देशभर प्रकाशझोतात आले होते. शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर विमानप्रवास करण्याची बंदी एअर इंडियाने घातली होती त्यानंतर ती मागेही घेतली होती.

कोणत्या आरोपांतून सुटका?

मार्च 2017 साली बिजनेस क्लासचे तिकीट दिले नाही, म्हणून खासदार रवी गायकवाडांकडून एअर इंडिया कर्मचाऱ्यांस विमानातच चपलेने प्रकरण करण्यात आली होती. गायकवाड हे पुण्याहून दिल्लीला जात होते. या घटनेनंतर त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र त्यातील कलम 308 ( सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे) आणि कलम 201 ( पुरावे नष्ट करणे, खोटी माहिती देणे ) या आरोपातून रवींद्र गायकवाड यांची दिल्लीच्या कोर्टाने मुक्तता केली आहे. पण कलम 355 (अनादर करत अकारण हल्ला करणे ) नुसार रवी गायकवाड हे सकृतदर्शनी दोषी दिसत असल्याचे मत नोंदवीत या कलमानव्ये खटला चालणार आहे, असे कोर्टाने स्पष्ट केले.

इतर बातम्या-

Cotton Crop: इतिहासात पहिल्यांदाच पांढऱ्या सोन्यानं कात टाकली, व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा, शेतकऱ्याला आनंदाचं भरतं!

औरंगाबाद जि.प सभापतींनी मागितली 5% दलाली, खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप, मुख्यमंत्र्यांकडे काय तक्रार केली?

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.