AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक महिला 15 वर्षे पंतप्रधान होती, पण महिलांचे दुःख दूर केले नाही, औरंगाबादेत रावसाहेब दानवेंची इंदिरा गांधींवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि घराघरातील चुलीसमोर बसलेल्या महिलांचं दुःख दूर करण्यासाठी त्यांनी 100 रुपयात गॅस उपलब्ध करून दिला. आज औरंगाबादमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात घराघरात पाइपलाइनच्या माध्यमातून गॅस उपलब्ध करून देणाऱ्या योजनेचा शुभारंभ होत आहे, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं.

एक महिला 15 वर्षे पंतप्रधान होती, पण महिलांचे दुःख दूर केले नाही, औरंगाबादेत रावसाहेब दानवेंची इंदिरा गांधींवर टीका
औरंगाबादेत मंत्री रावसाहेब दानवे यांची माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर नाव न घेता टीका
| Edited By: | Updated on: Mar 02, 2022 | 4:06 PM
Share

औरंगाबादः एक महिला 15 वर्षे देशात पंतप्रधान होती, पण महिलांचे दुःख दूर केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सत्तेत आले आणि पहिल्या पाचच वर्षात महिलांचं दुःख दूर केलं, असं वक्तव्य करत रावसाहेब दानवे यांनी आज माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्यावर टीका केली.  भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी आज औरंगाबादेत बोलताना हे वक्तव्य केलं. शहरातील गॅस पाइप लाइन कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलेत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखाली आज औरंगाबाद शहरात गॅस पाइप लाइनच्या कामाचा शुभारंभ होत असून येत्या काही वर्षात घरोघरी पाइपद्वारे गॅस पोहोचेल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आळा होता.

इंदिरा गांधींबाबत काय म्हणाले दानवे?

शहरातील गॅस पाइपलाइनच्या उद्घाटन कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले, एक महिला देशात 11 वर्ष पंतप्रधान होती. पण महिलांचं दुःख तिनं समजून घेतलं नाही. फक्त चूल आणि मूल हेच महिलांचं काम आहे, असं त्यांना वाटत होतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि घराघरातील चुलीसमोर बसलेल्या महिलांचं दुःख दूर करण्यासाठी त्यांनी 100 रुपयात गॅस उपलब्ध करून दिला. आज औरंगाबादमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात घराघरात पाइपलाइनच्या माध्यमातून गॅस उपलब्ध करून देणाऱ्या योजनेचा शुभारंभ होत आहे, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं.

शहरातील गॅस पाइपलाइनच्या कामाचं थाटात उद्घाटन

औरंगाबाद शहरातील तब्बल दोन लाख कुटुंबांना पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा करण्याच्या योजनेचे आज औरंगाबाद मध्ये उद्घाटन करण्यात आलं. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आलं. औरंगाबाद शहरात तब्बल 60 किलोमीटर अंतरापर्यंत ही गॅस पाईपलाईन असेल. येत्या सहा महिन्यात औरंगाबाद शहरातल्या पहिल्या ग्राहकाला गॅस लाईन द्वारे गॅस पुरवठा केला जाणार आहे तर येत्या दोन वर्षात तब्बल दोन लाख नागरिकांना पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा केला जाणार आहे, असं आश्वासन भाजपच्या वतीने देण्यात आलं आहे. या योजनेचे आज औरंगाबाद शहरातील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर उद्घाटन करण्यात आले. यावेळी तब्बल 10 हजार नागरिकांनी गर्दी केली होती, मात्र औरंगाबाद शहरातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती.

इतर बातम्या-

Breaking News: तिसरं महायुद्ध हे अणूयुद्ध असेल, पुतिनचे इरादे रशियाच्या परराष्ट्र मंत्र्याकडून जाहीर

Nagpur | पतंजली उद्योगाचे उत्पादन लवकरच सुरू होणार, मिहानमधील विकासकामाबाबत दीपक कपूर काय म्हणाले?

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.