AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गद्दार म्हणणाऱ्यांचं थोबाड फोडलं पाहिजे; संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर अंबादास दानवे यांची नेमकी प्रतिक्रिया काय?

आता गद्दारी केल्यानंतर यांना अशी बुद्धी सुचली आहे. हे आदित्य ठाकरे यांच्या मागे चारदा फिरत होते. त्यामुळं गद्दारीशिवाय याला दुसरा कोणताही शब्द नसल्याचंही ते म्हणाले.

गद्दार म्हणणाऱ्यांचं थोबाड फोडलं पाहिजे; संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर अंबादास दानवे यांची नेमकी प्रतिक्रिया काय?
अंबादास दानवे
| Edited By: | Updated on: Jan 24, 2023 | 4:25 PM
Share

औरंगाबाद : बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्यावरून काही घडामोडी घडल्या. गद्दारांना तैलचित्र लावण्याचा अधिकार नसल्याचं ठाकरे गटाच्या वतीनं सांगण्यात आलं. बाळासाहेब ठाकरे यांनाही वाईट वाटत असले, असंही ठाकरे गटाच्या वतीनं सांगण्यात आलं. त्यावर शिंदे गटाचे संजय शिरसाट म्हणाले, असं जे कोणी बोलतात. त्यांच थोबाड फोडलं पाहिजे. यावर बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, दम असेल, तर फोडून दाखवावं. मी म्हणतो आता गद्दार. गद्दारांना अधिकार नाही. दम असेल तर फोडून दाखवा, असं आव्हान अंबादास दानवे यांनी दिलं.

आदित्य ठाकरे यांना काय कळतं. बाळासाहेब ठाकरे यांच्या मांडीवर बसले म्हणून त्यांना महत्त्व आहे. नाहीतर त्यांना कुत्रही विचारलं नसतं. यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, मग, संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरे यांच्या चार-चार सभा कशाला घेतल्या. त्यांच्या हस्ते चार-चार उद्घाटनं कशाला केले. त्यांना समजत नसेल, तर आदित्य ठाकरे यांची सभा मतदारसंघात व्हावी, म्हणून का प्रयत्न करत होते, असा सवालही अंबादास दानवे यांनी विचारला.

गद्दारीशिवाय दुसरा शब्द नाही

आता गद्दारी केल्यानंतर यांना अशी बुद्धी सुचली आहे. हे आदित्य ठाकरे यांच्या मागे चारदा फिरत होते. त्यामुळं गद्दारीशिवाय याला दुसरा कोणताही शब्द नसल्याचंही ते म्हणाले.

३० जानेवारीला निवडणूक आयोगाची सुनावणी आहे.त्यावेळी शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाला याबद्दल निर्णय येण्याची शक्यता आहे. ठाकरे गटानं तारीख वाढवून घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जातोय.

१६ आमदारांची अपात्रता होणार?

यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, मग आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत असं म्हणायचं का की, १६ आमदारांची अपात्रता होणार आहे. म्हणून सर्वोच्च न्यायालय तारीख वाढवून देत आहे. पण, असं आम्ही म्हणणार नसल्याचंही अंबादास दानवे यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, दिल्लीच्या आदेशाशिवाय हे काही करू शकत नाही. हे सांगतात आम्ही शिवसेनेचे आहोत. पण, यांचे नेते, नेतृत्व दिल्लीत आहेत. त्यांच्या आदेशाशिवाय हे पानही हालवू शकत नाही.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.