AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘साहेब घरचं चांगलंय, 8-9 एकर जमीन, पण कुणी मुलगीच देईना’, वैतागलेल्या तरुणाचा थेट आमदाराला फोन

ग्रामीण भागातल्या तरुणांच्या लग्नाचा प्रश्न गंभीर बनलाय. औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका तरुणानं लग्नासाठी चक्क आमदारांनाच साकडं घातलंय. लग्नासाठी मुलगी पाहण्याची विनंती त्यानं आमदार उदयसिंह राजपूतांना केलीय.

'साहेब घरचं चांगलंय, 8-9 एकर जमीन, पण कुणी मुलगीच देईना', वैतागलेल्या तरुणाचा थेट आमदाराला फोन
Follow us
| Updated on: Jan 10, 2023 | 11:26 PM

औरंगाबाद : कन्नड विधानसभेचे आमदार उदयसिंह राजपूत (Uday Singh Rajput) यांच्याकडे एका तरुणानं चक्क आपल्याला लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याची तक्रार केलीय. घरी जमीन-जुमला आहे, शोतीतून मिळणारं उत्पन्न मुबलक आहे. पैसापाणी आहे. तरीही लग्नासाठी मुली मिळत नाहीत, अशी तक्रार तरुणाची आहे. काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर लग्नाळू तरुणांचा अभूतपूर्व मोर्चा निघाला होता. लग्नासाठी मुली मिळत नसलेल्या अस्वस्थ तरुणांनी हा मोर्चा काढला होता. सजूनधजून, घोड्यावर बसून, वाजंत्री वाजवत हे तरुण जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले होते.

लग्नासाठी मुलींच्या अपेक्षा खूप जास्त वाढल्याचं तरुणांचं म्हणणं आहे. मुलाला नोकरी असावी, मुलगा शहरातच नोकरी करणारा असावा, शहरात स्वत:चं घर किंवा फ्लॅट असावा, शक्यतो एकत्रित कुटुंब नसावं, शहरात नोकरी असेल तरी मुलाला गावाकडे जमीनजुमला असावा, मुलगा दिसायला देखणा हवा. मुलगा मुलीच्या आईवडिलांची काळजी करणाराही असावा, अशा मागण्या मुली करु लागल्या आहेत.

त्यामुळं शेतकरी मुलांची लग्नं होणं अवघड झालंय. मुलांना मुली न मिळण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे लिंग गुणोत्तर. सध्या महाराष्ट्रातलं लिंग गुणोत्तर 1 हजार मुलांमागे 920 मुली इतकं आहे. याचा अर्थ हजारातली जवळपास 80 मुलं अविवाहीतच राहणार.

हे सुद्धा वाचा

पहिल्या काळात लग्न ठरवण्यासाठी कुठल्याही विवाह संस्थेची गरज नसायची.पण अलीकडे गल्लीबोळात विवाह नोंदणी संस्था निर्माण झाल्या आहेत.

काही लग्नाळू तरुणांची आर्थिक फसवणूक करणारे दलालही निर्माण झाले आहेत. एवढं होऊनही लग्न ठरत नसल्यानं तरुणाई अस्वस्थ झालीय. आधी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. आणि आता लग्नासाठी थेट आमदारालाच साकडं घालण्याचा प्रकार झालाय.

आमदार आणि तरुण यांच्यात नेमकं संभाषण काय?

विजय होळकर- हॅलो आ.उदयसिंह राजपूत- हॅलो विजय होळकर- हॅलो साहेब जय महाराष्ट्र आ. उदयसिंह राजपूत- जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र विजय होळकर- रत्नापूरवरुन बोलतोय साहेब, विजय होळकर, ग्रामीणमधून आ. उदयसिंह राजपूत- बोला, बोला ना विजय होळकर- काय निवांत होते का साहेब? आ. उदयसिंह राजपूत- नाही बसलो होतो..बोला..बोला ना विजय होळकर- साहेब असा विषय होता. घरी चांगलं आहे आपल्या, एवढी काय वाईट परिस्थिती नाही. 8-9 एकर जमीन आहे. पण साहेब इकडं कुणी मुलगीच द्यायला तयार नाही साहेब. आ. उदयसिंह राजपूत- कुठं? विजय होळकर- आपलं रत्नापूर म्हणजे खुलताबाद भद्रा मारुती आ. उदयसिंह राजपूत- तुमचा बायोडाटा पाठवून द्या विजय होळकर- बायोडाटा म्हणजे. रत्नापूरपासून खाली फुलंब्री रोडनं खाली 6 किलोमीटरवर गाव आहे आ. उदयसिंह राजपूत- बायोडाटा पाठवून द्या विजय होळकर- परिस्थिती चांगली आहे साहेब पण आ. उदयसिंह राजपूत- बायोडाटा पाठवून द्या विजय होळकर- विकासभाऊच्या याच्यावर पाठवू का? आ. उदयसिंह राजपूत- पाठवून द्या. पाठवून द्या विजय होळकर- विकासभाऊचा नंबर आहे माझ्याकडे व्हॉट्सअॅपचा. तुमचा हाच नंबर आहे का? आ. उदयसिंह राजपूत- पाठवून द्या. पाठवून द्या विजय होळकर- तुमच्या कन्नड सर्कलमध्ये भरपूर मुली आहेत साहेब आ. उदयसिंह राजपूत- बरं बरं..ठीक आहे..बोलतो बोलतो

भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष
भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष.
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल.
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं...
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं....
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण...
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण....
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्...
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्....
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी...
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी....
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय.
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी.
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले...
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले....
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.