AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतोष देशमुख यांच्या मुलाला आणि मुलीला काय व्हायचंय? पहिल्यांदाच सांगितलं मनातलं

या प्रकरणी सरकारकडून विविध चौकशी समिती नेमून चौकशी केली जात आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, यासाठी सातत्याने मोर्चा, आंदोलन केले जात आहेत.

संतोष देशमुख यांच्या मुलाला आणि मुलीला काय व्हायचंय? पहिल्यांदाच सांगितलं मनातलं
santosh deshmukh daughter son
| Updated on: Jan 10, 2025 | 4:33 PM
Share

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या हत्येनंतर राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. सध्या हे सर्व आरोप पोलीस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडेच या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यालाही अटक केली. वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप आहे. या प्रकरणी सरकारकडून विविध चौकशी समिती नेमून चौकशी केली जात आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, यासाठी सातत्याने मोर्चा, आंदोलन केले जात आहेत.

संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी अनेक गावात सर्वपक्षीय नेत्यांकडून मोर्चा काढण्यात येत आहे. आज जालन्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संतोष देशमुख यांचे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले हाते. यावेळी संतोष देशमुख यांच्या दोन्हीही मुलांनी त्यांना काय व्हायचं याबद्दल भाष्य केले. यावेळी संतोष देशमुख यांचे कुटुंबिय आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, आम्ही मूक मोर्चा सहभागी होतो. आरोपीला ताब्यात घेणे गरजेचे आहे. तपासाचा भाग आहे, पण लवकरात लवकर आरोपी आणि मोबाईल ताब्यात घेतला पाहिजे, आम्हाला लवकरात लवकर न्याय पाहिजे, असे म्हणाले.

दुःखातून आम्ही बाहेर पडू की नाही माहित नाही

“माझ्या वडिलांवर जो अन्याय झाला, त्यासाठी जर आम्हाला बाहेर पडून न्याय मागावा लागत असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट कोणती नाही. आज आमच्यावर, आमच्या कुटुंबियांवर, गावावर दुःख आहे. हे दुःख खूप मोठं आहे, त्या दुःखातून आम्ही बाहेर पडू की नाही माहित नाही. मात्र या दुःखाला थोडंसं मागे सारून न्यायामध्ये पुढे जातोय. ही वेळ आमच्या कुटुंबावरती आली ती दुसऱ्या कोणत्याही कुटुंबियावर येऊ नये, अस आम्हाला वाटतं”, असे संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख म्हणाले.

“मला डॉक्टर व्हायचं आहे. ते माझे स्वप्न आहे. माझ्या अभ्यासाचा विचार केला तर, माझं एक वर्षे बॅक लॉग झालं तर ते मी पुढच्या वर्षी करू शकते, पण अजून न्यायाच्या विषय आहे. माझ्या वडिलांचे बलिदान मला व्यर्थ जाऊ द्यायचं नाही, त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. माझ्या वडिलांच्या आधी, घटना किंवा दुसऱ्या प्रकारे ज्यांची हत्या झाली ते आवाज उठवू शकले नाही. आज आपण न्यायासाठी लढतोय, तर आपण सगळ्यांना न्याय देऊ असं मला वाटतं”, असे वैभवी देशमुखने म्हटले.

“…तर कोणीच पुढाकार घेणार नाही”

“माझ्या अभ्यासाचा विषय जो आहे, तो मी पुढच्या वर्षी सुद्धा कव्हर करू शकते. पण हा जर विषय मागे पडला तर कोणीच पुढाकार घेणार नाही. दहावीपर्यंत काय व्हायचं निश्चित नव्हतं पण वडिलांना वाटलं की, ही आता करते तर खूप मोठ व्हावं, स्वतःच्या पायावर उभी राहावी, असे वैभवी देशमुख म्हणाली. तर संतोष देशमुख यांचा मुलगा विराजने मला इंजिनियर व्हायचं आहे”, असे सांगितले

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.