AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed Drowned : बीडमध्ये गोदावरी नदीत बुडून सख्ख्या मावस बहिणींचा मृत्यू, एकीला वाचवायला दुसरी गेली अन् दोघीही बुडाल्या

दिपाली बरबडे ही गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी येथील रहिवासी होती तर स्वाती चव्हाण ही परतूर तालुक्यातील आनंदवाडी येथील रहिवासी होती. त्या दोघी नात्याने सख्या मावस बहिणी होत्या. शाळा, महाविद्यालयाला उन्हाळी सुट्या असल्याने त्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीच्या तिरावर असलेल्या महातपुरी येथील त्यांच्या मावशीकडे आल्या होत्या.

Beed Drowned : बीडमध्ये गोदावरी नदीत बुडून सख्ख्या मावस बहिणींचा मृत्यू, एकीला वाचवायला दुसरी गेली अन् दोघीही बुडाल्या
बुडून मृत्यूImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 04, 2022 | 5:45 PM
Share

बीड : बीड जिल्ह्यात वाळूमाफियांनी हौदोस माजवला आहे. वाळू माफियांमुळे माजलगाव तालुक्यातील महातपुरी येथे गोदावरी नदी (Godavari River)च्या पात्रात बुडून दोन मावस बहिणीं (Sisters)चा दुर्दैवी बुडून (Drowned) मृत्यू झाला आहे. दीपाली गंगाधर बरबडे (20) आणि स्वाती अरुण चव्हाण (12) असं या दोघा मुलींची नावं आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत त्या गावी आल्या होत्या. यादरम्यान गोदावरी नदीवर कपडे धुण्यासाठी गेले असता, त्या पोहण्यासाठी पाण्यात उतरल्या. मात्र या ठिकाणी वाळू माफियांनी खोदून ठेवलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने यात बुडून त्या दोघींचा मृत्यू झाला. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेनंतर वाळुमाफियांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिक करीत आहेत.

दोघीही उन्हाळी सुट्टीत मावशीकडे आल्या होत्या

दिपाली बरबडे ही गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी येथील रहिवासी होती तर स्वाती चव्हाण ही परतूर तालुक्यातील आनंदवाडी येथील रहिवासी होती. त्या दोघी नात्याने सख्या मावस बहिणी होत्या. शाळा, महाविद्यालयाला उन्हाळी सुट्या असल्याने त्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीच्या तिरावर असलेल्या महातपुरी येथील त्यांच्या मावशीकडे आल्या होत्या. या कालावधी दरम्यान शुक्रवारी 3 जून रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दीपाली आणि स्वाती आपल्या मावशीसोबत कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या.

लहान बहिणीला वाचवताना दोघीही बुडाल्या

गंगेत अंघोळ करण्याच्या नादात स्वाती चव्हाण ‌अंघोळ करत असताना खोल पाण्यात पडली.‌ ती बुडत असल्याचे पाहून दिपालीने पाण्यात उडी मारली. पण दोघींनाही पोहता येत नव्हते त्यामुळे त्यांनी एकमेकींना मिठ्ठी मारली अन् दोघीही बुडाल्या. यानंतर मावशी व इतर महिलांनी आरडाओरड केल्यानंतर काही पुरुष तेथे धावून आले आणि त्यांनी मुलींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण बराच वेळ लोटल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आले. त्यांना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या पार्थिंवाचे शवविच्छेदन माजलगाव ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. या प्रकरणी लक्ष्मण रामभाऊ शिंगाडे यांच्या माहितीनुसार माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूंची नोद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल माणिक राठोड करत आहेत. (Cousin sisters drowned in Godavari river in Beed)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.