AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

J P Nadda | महाराष्ट्रातही शिवसेना संपतेय, एक दिवस देशात फक्त भाजपाच राहील, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांच्या वक्तव्यावरून खळबळ

भाजप अत्यंत विचारपूर्वक हा राष्ट्रीय कार्यक्रम राबवतोय. मात्र या देशात अजूनही लोकशाही आहे. लोक सगळं बघतायत, अशी प्रतिक्रिया अनिल देसाई यांनी दिली.

J P Nadda | महाराष्ट्रातही शिवसेना संपतेय, एक दिवस देशात फक्त भाजपाच राहील, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांच्या वक्तव्यावरून खळबळ
जे पी नड्डा, अमित शहाImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Aug 01, 2022 | 3:19 PM
Share

पाटणा (बिहार): बिहारची राजधानी पाटणा (Bihar Patna) येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) यांनी केलेल्या एका वक्तव्याने देशभरात सध्या खळबळ माजली आहे. आता महाराष्ट्रातही शिवसेना संपुष्टात येतेय. इतर राज्यातही अशीच स्थिती आहे.  देशातील सर्व राजकीय पक्ष एक दिवस संपतील. फक्त भाजप शिल्लक रहिल, या उद्देशाने भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे, असं जे पी नड्डा म्हणाले. पाटण्यात जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांनी भाजप कार्यालयात खासदार आणि आमदारांची नुकतीच बैठक घेतली. भाजपने येथे दोन दिवसीय कार्यसमितीची बैठक घेतली. या बैठकांचे पाच सत्र झाले. कार्यक्रमाच्या संमारोपाला अमित शहा आणि जे पी नड्डा यांनी भाजपच्या नेत्यांना संबोधित केले. यावेळी भविष्यात देशात एकही असा पक्ष उरायला नको, जो भाजपच्या विरुद्ध ळढेल. जेणेकरून इतर सर्व राजकीय पक्ष संपून जातील, फक्त भाजपा उरेल, असं वक्तव्य जे पी नड्डा यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी तीव्र टीका केली आहे. महाराष्ट्रातदेखील संजय राऊतांविरोधातील कारवाईमुळे आधीच राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे जे पी नड्डांच्या वक्तव्यावरून राज्यातही टीका केली जातेय.

जे पी नड्डांचं वक्तव्य काय?

बिहारमधील भाजपाच्या 16 जिल्हा पक्ष कार्यालयाचं उद्घाटन जेपी नड्डा यांच्या हस्ते झालं. यावेळी समारोपाच्या कार्यक्रमात बोलताना जे पी नड्डा यांनी प्रादेशिक पक्षांवर हल्ला चढवला. सध्या देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपविरोधात लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही. महाराष्ट्रातदेखील शिवसेनेला घरघर लागली आहे. काँग्रेसचेही अनेक राज्यांतून गाशा गुंडाळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता उरलेले पक्षही संपतील. देशात फक्त भाजप शिल्लक राहील, असा दावा जे पी नड्डा यांनी केला. आता कोणताही पक्ष भाजपाला मात देऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

काँग्रेस तर आता बहीण-भावाचा पक्ष

भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना जे पी नड्डा म्हणाले, बिहारमध्ये आम्ही राजदविरोधात लढत आहोत. तो एक घराणेशाहीचा पक्ष आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी हादेखील असाच पक्ष आहे. ओडिशात नवीन बाबू यांचाही एकाच व्यक्तीचा पक्ष आहे. महाराष्ट्रात शिवसेना संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. याच प्रकारे काँग्रेससुद्धा आता बहीण-भावाचा पक्ष उरलाय.

देशात लोकशाही शिलल्क आहे…- अनिल देसाई

महाराष्ट्रात शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी जेपी नड्डांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. नड्डा हे शक्तीशाली नेते आहेत. भाजप अत्यंत विचारपूर्वक हा राष्ट्रीय कार्यक्रम राबवतोय. मात्र या देशात अजूनही लोकशाही आहे. लोक सगळं बघतायत, अशी प्रतिक्रिया अनिल देसाई यांनी दिली.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.