AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘उद्धव ठाकरे, असेल हिंमत तर घ्या जगदंबेची शपथ आणि सांगा….’, चंद्रशेखर बावनकुळे यांनी ललकारलं

भाजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतंच पोहरादेवीची शपथ घेऊन अमित शाह यांच्यासोबत 2019 मध्ये बंद दाराआड झालेल्या चर्चेत काय फॉर्म्युला ठरला होता, याबाबत वक्तव्य केलं. त्यानंतर आता बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना थेट चॅलेंजच दिलं आहे.

'उद्धव ठाकरे, असेल हिंमत तर घ्या जगदंबेची शपथ आणि सांगा....', चंद्रशेखर बावनकुळे यांनी ललकारलं
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 10, 2023 | 6:24 PM

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल भाषण करताना पोहरादेवीची शपथ घेत सांगितलं होतं की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत 2019च्या विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्रीपदाबाबत अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता. त्यांनी जगदंबेची शपथ घेऊनही हीच गोष्ट सांगितली. पण दुसरीकडे भाजपकडून याबाबत खंडन केलं जातंय. मुख्यमंत्रीपदाबाबत तसा काहीच फॉर्म्युला ठरला नव्हता, असं भाजप नेत्यांकडून स्पष्ट करण्यात येतंय. उद्धव ठाकरे यांनी काल पुन्हा याबाबतचा उल्लेख केल्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना शपथ घेऊन खुलासा करण्याचं आव्हान दिलं आहे.

“उद्धवजी, केंद्र सरकारच्या लोकाहिताच्या योजनांना फसव्या, बोगस म्हणून तुम्ही बांधावर, टपरीवर चर्चा करणार असाल तर, होऊ द्या चर्चा. पण, सध्या एकच चर्चा आहे. ती म्हणजे, तुम्ही जागोजागी देवाधिकांच्या “शपथा” का घेताहात? मग, असेल हिंमत तर एकदा शपथेवर सांगाच”, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना थेट चॅलेंज देवून टाकलं.

हे सुद्धा वाचा

चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकं काय आव्हान दिलं?

“2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांचे फोन तुम्ही का घेतले नाहीत ? घ्या, जगदंबेची शपथ! वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे “सुत ” आहात, तर आता सांगाच तुमचे “सुत” कोणाशी जुळले होते? घ्या शपथ आणि कळू द्या तुमची वचनबद्धता”, असं आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आणखी एक व्हिडीओ ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “उद्धव ठाकरे यांचं त्यांचा पक्ष वाढवणं हे कामच आहे. पण ते विदर्भात येवून ज्या पद्धतीने बोलत आहेत, खरंतर अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी विदर्भाच्या वैधानिक विकास मंडळाला स्थगिती दिली”, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

“नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन घेतले नाही, डीपीसीचे पैसे कमी केले, सिंचन आणि रस्त्यांचा बॅकलॉग वाढला. सत्ता असताना विदर्भाच्या विकासाकडे लक्ष दिले नाही. विदर्भाची जनता त्यांच्यावर नाराज आहे”, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.

दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू.
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया.
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?.